• Mon. Mar 16th, 2026

    सावधान! जलजन्य आजारांचा वाढतोय ताप; गेल्या वर्षी राज्यात ३९९१ जण बाधित, तर १५ जणांचा मृत्यू

    सावधान! जलजन्य आजारांचा वाढतोय ताप; गेल्या वर्षी राज्यात ३९९१ जण बाधित, तर १५ जणांचा मृत्यू

    सन २०२४मध्ये गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ या आजारांमुळे ३,९९१ जण बाधित झाले, तर पंधरा जणांना प्राण गमवावा लागला. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येते.

    हायलाइट्स:

    • मागील चार वर्षांच्या तुलनेत सन २०२४मधील रुग्णसंख्या सर्वाधिक
    • पाण्याच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त
    • टँकरद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासण्या आवश्यक
    महाराष्ट्र टाइम्स
    health department

    मुंबई : राज्यात दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांची संख्या वाढती असून, जीबीएस आजाराची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. सन २०२४मध्ये गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ या आजारांमुळे ३,९९१ जण बाधित झाले, तर पंधरा जणांना प्राण गमवावा लागला. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येते.सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१मध्ये १,६२२ जणांना जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला होता. २०२२मध्ये ही संख्या ३,७९२ इतकी होती, तर २०२३मध्ये १,२९३ जणांना जलजन्य आजारांची लागण झाली होती. सन २०२४मध्ये या संख्येत वाढ होऊन १,४७४ जणांना डायरिया होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. १,०२८ जणांना कॉलराची बाधा झाली होती, तर चार जणांना त्यामुळे प्राण गमवावे लागले. गॅस्ट्रो झालेल्या रुग्णांची संख्या ६६९ होती आणि त्यामुळे चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ८२० जणांना कावीळ झाली आणि त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
    अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा का नाही? मुंबई हायकोर्टाचा सरकारला सवाल
    जलजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी व्यक्त केली. अनेक भागांमध्ये पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही. तिथे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याच्या किती नियमित तपासण्या केल्या जातात याकडे लक्ष द्यायची गरजही त्यांनी व्यक्त केली.

    पाण्यामध्ये जंतूप्रादुर्भाव किती आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पिण्यासाठी योग्य असलेल्या पाण्याचा ‘पीएनपी’ हा शून्य ते अधिकाधिक दोन असावा लागतो. तो जितका अधिक तितके शरीराला घातक असणारे जंतू त्यामध्ये असतात. दूषित पाण्यातून कॉलरा, अतिसार, उलट्या होण्यासाठी कारणीभूत असणारे जंतू माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
    Devendra Fadnavis: उद्योगांना त्रास दिल्यास थेट ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना आदेश
    ग्रामीण भागांमध्ये उघड्या विहिरींमध्ये कचरा, सांडपाणी, झाडांचा पालापाचोळा, गुराढोरांचे मलमूत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाचे पाणीही अनेकदा या उघड्या विहिरीतील जलस्त्रोतांमध्ये मिसळून दूषित होते. शहरातील पाणी शुद्ध असते असा समज असतो, मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. ज्या ठिकाणी पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, तिथे इतर स्त्रोतांच्या माध्यमातून येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते का, हा मुख्य मुद्दा आहे. या पाण्याचीही नियमित स्वरूपामध्ये चाचणी होणे गरजेचे आहे.

    पाणी उकळून प्या तसेच बर्फाचे, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी केले आहे. त्यासोबतच दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची नियमित चाचणी होणे गरजेचे आहे याकडे सार्वजनिक आरोग्य अभ्यासक के. जे. म्हात्रे यांनी लक्ष वेधले.

    गुणवत्ता निर्देशांक शून्य ते दोन असावा
    पिण्यासाठी योग्य असलेल्या पाण्याचा शुद्धतेचा गुणवत्ता निर्देशांक हा शून्य ते जास्तीतजास्त दोन असावा लागतो. तो जितका अधिक असतो तितकी त्यात घातक जंतू असण्याची शक्यता असते. त्यावरून शंभर मिली पाण्यामध्ये किती जंतू आहेत हे लक्षात येते. हे जंतू अधिक असल्यास त्या पाण्यामध्ये माणसाची विष्ठा मिसळल्याचा निष्कर्ष काढता येतो. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता कशी आहे हे स्पष्ट होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध – महासंवाद
    विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती संचालक कार्यालयाकडून अभिनंदन – महासंवाद
    सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed