• Fri. Mar 13th, 2026

    Nitesh Rane: मुख्यमंत्रिपदासाठी मातोश्रीने किती उपवास केले? नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार

    Nitesh Rane: मुख्यमंत्रिपदासाठी मातोश्रीने किती उपवास केले? नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार

    Nitesh Rane On Sanjay Raut: चंद्रपूर येथील बैठकीसाठी नितेश राणे आले असता पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाबत संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवरून राणे यांनी तोफ डागली.

    महाराष्ट्र टाइम्स
    raut rane

    म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर: मुख्यमंत्रिपदासाठी मातोश्रीने किती उपवास केले, लिंबांचे तोरण बांधले, याची माहिती राज्याला द्यावी, असा टोला मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना लगावला.

    चंद्रपूर येथील बैठकीसाठी नितेश राणे आले असता पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाबत संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवरून राणे यांनी तोफ डागली.

    ठाकरे गटात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यांच्या पक्षात कोण राहणा, काँग्रेसच्या कोणत्या नेत्याबाबत वाटाघाटी चालली, यावरही भाष्य करावे. पक्षात स्वत:चे स्थान आणि मालकाच्या पक्षात किती वेळ राहणार, यावरही बोलावे, असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला.
    नाग नदीला २९५ कोटींचे बळ! केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद, गेल्यावर्षी मिळाले होते ५०० कोटी
    आमदार संजय सिरसाट यांनी एकीकरणाबाबत भाष्य करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांचे मत जाणून घ्यावे. त्यांनी स्वत:चा संजय राऊत करून घेऊ नये, असे नितेश राणे यांनी सूचवले.

    बांग्लादेशी व रोहिंग्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ही कीड त्यांच्या बेड्यापर्यंत सोडली जात आहे. त्यांना भारतात आणणारे बाप व अब्बा कोण यावरही लक्ष आहे. महाराष्ट्रात बांग्लादेशी रोहिंगे दिसणार नाही, हुसकावून लावू, असा दावाही नितेश राणे यांनी केला.
    पोटच्या लेकीनेच बापाला फसवलं; ५ कोटी कर्जाचे आमिष, दागिने मोडून दिलेले पैसे, पण घडलं काही वेगळंच…
    राज्यात गोड्या पाण्यातील मत्स व्यवसायाचे धोरण तयार केले जात आहे. यातून उत्पादन व रोजगार वाढीवर भर दिला जाणार आहे. चंद्रपुरातील धर्मसभेत सहभागी होत आहे. आमदार, मंत्री होण्यापूर्वी आधी हिंदू आहे, हे विसरता येणार नाही. हिंदुत्वाचे सरकार आहे, याची जाणीव करून देण्यासाठी जात आहे, असेही राणे यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed