• Mon. Mar 9th, 2026

    हमीभाव खरेदी केंद्राची तारीख वाढवून मिळावी, लातूरमधील ५० टक्के शेतकरी वेटींगवर, काय घडलं?

    हमीभाव खरेदी केंद्राची तारीख वाढवून मिळावी, लातूरमधील ५० टक्के शेतकरी वेटींगवर, काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2025, 9:04 pm

    लातूर जिल्हा हा सोयाबीनचा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकूण क्षेत्रापैकी ६५ ते ७० टक्के शेतकरी सोयाबीनचा फेरा करतात.लातूर जिल्ह्यातील एकूण ५६ खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी सुरू आहे.मात्र अद्यापपर्यंत जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांचीच खरेदी हमीभाव केंद्रावर झाली आहे. नोंदणी केलेले अर्धे शेतकरी हे सोयाबीन खरेदीपासून वंचित आहेत. ६ फेब्रुवारी पर्यंत केंद्र सरकारकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यापूर्वी ३१ जानेवारी ही सोयाबीन खरेदी केंद्राची डेडलाईन ठरवण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चाही निघाला होता. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र हे फेब्रुवारी अखेरपर्यंत चालू ठेवावेत अन्यथा आमच्याकडे…आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed