• Sun. Jun 7th, 2026

    महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार… कृषी क्षेत्रात AI च्या वापरासाठी सरकारची तयारी, अजित पवारांची घोषणा

    महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार… कृषी क्षेत्रात AI च्या वापरासाठी सरकारची तयारी, अजित पवारांची घोषणा

    Ajit Pawar On AI Agriculture Sector : अजित पवारांनी कृषी क्षेत्रात AI च्या वापराबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत भाष्य केलं आहे. त्यांनी शेतीसाठी एआयचा वापर कसा केला जाईल, याबाबत माहिती दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    ajit pwar

    मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भाष्य केलं. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते.
    मी देखील अर्थसंकल्प सादर करणार, लाडक्या बहिणी आणि…; Budget 2025 नंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

    कसा केला जाईल एआयचा वापर

    राज्याच्या कृषी विभागाला प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेचं मूल्यांकन करण्यासाठी सहकार विभागासोबत जवळून काम करण्याचं निर्देश अजित पवारांनी दिले आहेत. शेतीच्या क्षेत्रात एआयच्या वापराबाबत अजित पवारांनी सांगितलं, पीक स्थिती, मातीची कार्बन पातळी आणि मातीची स्थिती यासारख्या महत्त्वाच्या घटकांवर एआय वापरून परीक्षण केलं जाऊ शकतं. कृषी क्षेत्रात प्रायोगिकपणे एआयचा वापर करून उत्पादकता वाढवू शकतो आणि शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च कमी करू शकतो. एआयचा हा वापर शेतकऱ्यांसाठी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असावा, असंही ते म्हणाले.

    Ajit Pawar : केवळ उत्तर प्रदेश, बिहारचे नाही तर महाराष्ट्रात…. बांगलादेशींच्या घुसखोरीवर अजित पवारांचं मोठं विधान

    खर्च कमी करण्यास AI फायदेशीर ठरेल

    जगभरात AI विविध क्षेत्रात क्रांती करत आहे. यात कृषी क्षेत्रंही मागे राहू नये. उत्पादन खर्च कमी करताना उत्पादकता वाढवण्यात AI महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. बदलतं हवामान, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसंच कामगार यासारख्या आव्हानांना सामोरं जात असताना येत्या काही वर्षांत, एआय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरेल. AI द्वारे ही प्रगती अधित अचूक शेतीच्या पद्धती आणि उत्तम व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरेल.

    महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार… कृषी क्षेत्रात AI च्या वापरासाठी सरकारची तयारी, अजित पवारांची घोषणा

    कापणीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी AI ची मदत करता येईल. त्याशिवाय AI शेतकऱ्यांना श्रम आणि खर्च वाचवण्यातही मदत करेल, एआय शेतीसाठी अधिक टिकाऊ आणि फायदेशीर ठरेल, असंही अजित पवार म्हणाले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed