मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर गंभीर आरोप लावले जात आहेत. धनंजय देशमुख यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले आणि महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज देशमुख कुटुंबियांनी देखील महंतांची भेट घेतलीये.
नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात असल्याचे म्हटले. त्यानंतर आज देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतलीये. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी नामदेव शास्त्रींकडे काही पुरावे दिली. संतोष देशमुख हे भगवानगडावर येत असल्याचे त्यांनी काही फोटो दाखवले. त्यांनी म्हटले की, संतोष देशमुख हे अनेकदा भगवानगडावर आले आहेत, ते भगवानगडाला मानत होते. संपूर्ण देशमुख कुटुंबिय भगवानगडाला मानते. आमची शेती 22 वर्षांपासून मनोहर मुंडे करायचे. ते मागच्या महिन्यात वारले.
Sanjay Raut : ‘अमित शहांनी आश्वासन दिलेलं, पण… शिंदेंना धक्का बसलाय’; संजय राऊत यांचा खळबळजनक गौप्यस्फोटत्यांनी जे पिकवले तेच आम्ही खातो. त्यांची पोरं पुण्यात असतात. या घटनेनंतर देशमुख कुटुंबियांनी कधीही जातीयवाद केला नाहीये. माझ्या भावाने दलित मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावर महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले की, आरोपींना पाठिशी घालणार नाहीये. देशमुख कुटुंब भगवानगडाला मानणारे आहे. देशमुख कुटुंबियांच्या मागे आम्ही आहोत. भगवानगड तुमच्या पाठिशी आहे, असेही महंतांनी म्हटले आहे.
पुढे नामदेव शास्त्री यांनी म्हटले की, खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी, हे माझे भगवानगडाच्या गादीवरून सांगणे आहे. काहीवेळ धनंजय देशमुख आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये संवाद झालाय. संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. एसआयडी, सीआयडी या हत्येचा तपास करत आहे. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

