Authored byमानसी देवकर | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम1 Feb 2025, 8:16 pm
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. लातूर शहरातील व्यापाऱ्यांनी देखील या अर्थसंकल्पाबाबत आपले मत मांडले आहे. मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना दिलासा न देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे व्यापारी म्हणाले. मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांचा टॅक्स कमी करायला हवे होता अशी भावना लातूरकरांनी व्यक्त केली.