राज्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले, तर रक्त वाया जाण्याची शक्यता असते. असे रक्त नियमबाह्य प्रकारे इतर राज्यांना अनियंत्रित दराने विकले जाण्याचीही शक्यता जाते. अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये उद्भवली आहे.
हे रक्त ६ ते २६ जानेवारीदरम्यान संकलित करण्यात आल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते मुदतबाह्य होणार आहे. संकलनाच्या दिवसापासून पुढील ३५ दिवसांमध्ये रक्त कालबाह्य होत असल्याने, या मुदतीमध्येच त्याचा वापर करावा लागतो. मुंबईसह राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांनी संकलित रक्त वाया जाऊ नये यासाठी काय करावे, अशी विचारणा केली आहे; तर खासगी रक्तपेढ्यांनी हे रक्त राज्याबाहेर देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेपुढे आता या अतिरिक्त रक्ताचे व्यवस्थापन कसे करावे, अशी गंभीर समस्या आहे.
मुंबईकरांचं बजेट कोलमडणार! रिक्षा-टॅक्सीप्रवास आजपासून महाग, किती किमीसाठी किती दरवाढ? पाहा नवे रेट
सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांत एकाच वेळी अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. एका शिबिरामध्ये साठ हजारापेक्षा अधिक युनिट रक्तसंकलन झाले. मेगाकॅम्पबाबत निर्बंध असतानाही, अशा प्रकारची मोठी शिबिरे घेण्यात येतात. रक्त कालबाह्य होण्याचा कालावधी लक्षात घेता, त्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत सुटीच्या कालावधीमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा असतो. या वेळी रक्तदाते शोधावे लागतात.
डॉक्टर बनला हत्यारा! मेहुणीच्या प्रेमात बायकोला संपवलं, अॅसिडिटीच्या नावाखाली दिलेल्या झोपेच्या गोळ्या अन्…
रक्तपेढ्यांकडून विचारणा
राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या रक्ताचे व्यवस्थापन कसे करायचे अशी विचारणा रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे. हिंगोली येथील सिव्हिल रुग्णालयामध्ये रक्ताचे ७० युनिट असल्याचे कळवले आहे. इंदापूर येथील मुक्ताई रक्तपेढीने २७ जानेवारीला लिहिलेल्या पत्रामध्ये ‘ए पॉझिटिव्ह’ रक्तगटाचेो १३०, बी रक्तगटाचे १००, एबी पॉझिटिव्हचे ३५ आणि ओ गटाचे ११५ युनिट रक्त अतिरिक्त उपलब्ध असल्याचे कळवले आहे.
Kirit Somaiya: त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे नोंदवा; बांगलादेशींना जन्मदाखले देणाऱ्यांविरोधात सोमय्यांची मागणी
नागपूरच्या महिला रुग्णालयानेही ए, बी आणि ओ गटाचा अतिरिक्त साठा असून, त्याचे नियोजन कसे करावे, अशी विचारणा केली आहे. मालेगाव रक्तकेंद्राने ए, बी, ओ या रक्तगटाच्या १०० आणि एबीचे ३० युनिट रक्त उपलब्ध असल्याचे कळवले आहे. झारखंड, आंध प्रदेश; तसेच गुजरातला रक्त पाठवण्यासाठी खासगी रक्तपेढ्यांनी संमती मागितली आहे. मात्र, त्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापनाचे काय करणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे कळते.

