राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जानेवारीपासून तिकीट दरात १४.९५ टक्के भाववाढ करण्यात आली आहे. एसटीचा प्रवास महागल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तर विरोधकांनी देखील भाववाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अशातच शिवसेना आमदार योगेश कदम यांनी मोठे विधान केले आहे. चांगल्या सुविधांसाठी दरवाढीशिवाय पर्याय नव्हता, असे योगेश कदम म्हणाले.