• Sun. Mar 15th, 2026

    Ramdas Athawale: शरद पवार यांनी ‘एनडीए’त यावं; केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंची साद

    Ramdas Athawale: शरद पवार यांनी ‘एनडीए’त यावं; केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंची साद

    Ramdas Athawale: शरद पवारांनी विशिष्ट मुद्द्यांवर ‘एनडीए’मध्ये सामील व्हावे, अशी आमची तीव्र इच्छा असून, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतरच हे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    महाराष्ट्र टाइम्स
    ramdas athawale1

    म.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विकासाच्या मुद्द्यांवर ‘एनडीए’मध्ये सामील व्हावे, अशी इच्छा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री व रिपाइं (ए)चे नेते रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

    शरद पवारांनी विशिष्ट मुद्द्यांवर ‘एनडीए’मध्ये सामील व्हावे, अशी आमची तीव्र इच्छा असून, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतरच हे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘मनसे’ने मुंबईत परप्रांतीयांवर दादागिरी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्री आठवले नाशिकच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्यावर भाष्य केले. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर बरे होईल. प्रत्येक पक्षाचा स्वतःचा अजेंडा आणि विचारसरणी आहे.
    Uddhav Thackeray: अंगावर आलात, तर वळ घेऊन जाल; उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर घणाघाती टीका
    आमचीही स्वतःची विचारसरणी आहे आणि त्यामुळे भाजपविरोधात काही मुद्द्यांवर आमचे वेगवेगळे विचार आहेत. परंतु, आम्ही किमान समान कार्यक्रमावर आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला, असे आठवले म्हणाले. त्यामुळे शरद पवारांनीदेखील विकासाच्या मुद्द्यांवर ‘एनडीए’मध्ये सामील व्हावे, अशी आमची तीव्र इच्छा आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असा दावाही त्यांनी केला.
    ‘स्टीअरिंग’ माझ्याच हाती! राज ठाकरेंचा नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना संदेश, पहिल्याच दिवशी गुफ्तगू
    मनसेने दादागिरी करु नये
    परप्रांतीयांवर मराठी भाषा लादण्याच्या धोरणावरही आठवले यांनी टीका केली. मुंबई हे महानगर असून, येथे देशभरातून लोक नोकरीसाठी येतात. जे अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहेत ते मराठीदेखील बोलतात. जे नवीन येत आहेत त्यांना मात्र मराठी बोलता येत नाही. मात्र, तरीही मनसेने लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडणे चुकीचे असून, त्यांनी दादागिरी करू नये, असा टोलाही आठवले यांनी लगावला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed