Authored byमानसी देवकर | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम18 Jan 2025, 3:45 pm
आदित्य ठाकरेंनी पालकमंत्री पदावरून महायुतीला टोला लगावला होता. त्यांना पालकमंत्री सापडत नाहीत, तिघांमध्ये तू-तू मैं-मैं सुरुय, असे ठाकरे म्हणालेले. आदित्य ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही भास्कर जाधव यांना आवरावं, अशा शब्दात पाटलांनी इशारा दिला. तुमचे १० आमदार आमच्याकडे येतील, तुम्हाला कळणारही नाही, असेही पाटील म्हणाले.