• Mon. Mar 16th, 2026
    ईव्हीएमविरोधाची धार बोथट होत असताना बच्चू कडूंनी तार छेडली; म्हणाले, ‘कोर्ट बदमाश असले तरी…’

    Bachhu Kadu Stand Against EVM: महायुतीचा महााविजय हा ईव्हीएममध्ये फेरफार होऊनच झाला असल्याची टीका महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आली. या मुद्द्याची धार कुठेतरी कमी होत असताना आता बच्चू कडूंनी मुद्दा लावून धरला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमरावती : विधानसभा निवडणु्कीच्या निकालावर विरोधी पक्षातील अनेकांनी ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील ईव्हीएमविरोधात जोरकसपणे विरोध केला जात आहे. राज्यातील निवडणूक निकालानंतर अनेक विरोधी उमेदवारांकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. महायुतीचा महााविजय हा ईव्हीएममध्ये फेरफार होऊनच झाला असल्याची टीका महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आली. या मुद्द्याची धार कुठेतरी कमी होत असताना आता बच्चू कडूंनी मुद्दा लावून धरला आहे.

    बच्चू कडू यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. यानंतर कडूंनी महिन्याने आता एका गावातील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत ईव्हीएममध्ये घोळ झाला असल्याचे म्हटले आहे. बच्चू कडू म्हणाले की, माझं मतं कुणाला गेलं हे माहित असणं सामान्य मतदाराचा अधिकार आहे. मात्र आता व्हीव्हीपॅट म्हणजे वरलीचा खेळ झाला आहे. त्यासाठी आम्ही आता कोर्टात जाऊ, कोर्टही बदमाश आहे. कोर्ट आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही, पण आम्ही कोर्टात जाणार, असा निर्धार बच्चू कडूंनी केला आहे.

    बच्चू कडू निवडणूक लढवलेल्या अचलपूर मतदारसंघातील एका गावात मला मतदान कमी झाले आहे, असा उल्लेख त्यांनी स्वत: केला आहे. कडू पुढे म्हणाले, ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर मला मागच्या निवडणुकीत १४८ मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत केवळ ६० मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्या गावातील १२५ लोकांनी मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे याप्रकरणी आम्ही आता कोर्टात जाऊ, असेही ते म्हणाले.

    दरम्यान माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावातील नागरिकांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे सांगत मतदान आंदोलन सुरु केले होते. तर आम्ही बॅलेट पेपर पुन्हा मतदान घेणार असा पवित्रा साऱ्या गावकऱ्यांनी घेतला होता. त्यांना समर्थन देण्यासाठी महाविकास आघाडीतील नेतेही पुढे सरसावले आणि ईव्हीएम प्रणालीचा कडाडून विरोध केला. परंतु गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम विरोधी मोहिमेची धार बोथट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता बच्चू कडूंनी ईव्हीएम विरोधाची तार छेडली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *