• Tue. Jun 9th, 2026
    मित्राने फोन करुन बोलावलं, जुन्या भांडणाचा विषय निघाला आणि भर चौकात हत्याकांड; रिक्षा चालकासोबत भयंकर घडलं

    Solapur Crime News : सोलापुरात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. मद्यपान करताना भांडणं झालं आणि दोन मित्रांनी एकाला ठार केलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Lipi

    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. मित्रांनीच मित्राचा हत्या केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, रिक्षाचालक मित्राचा हत्या केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या २८ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. युवराज प्रभुलिंग स्वामी (वय २०, रा. शिवगंगा नगर, शेळगी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
    Raigad News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, पुण्यातील शिक्षकासोबत काशीद समुद्रावर अनर्थ घडला

    घरातून बोलावून घेतलं

    युवराज स्वामी हा रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावत होता. तो सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा (क्र.एमएच-१३ ५७७७) घेऊन भाडे मारण्यासाठी गेला. तो दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास व्यवसाय करून घरी आला, भाड्यातून मिळालेले ३०० रुपये त्याने घरखर्चासाठी बहीण लक्ष्मी हिच्याकडे दिले. रिक्षाधंदा करून घरी परतल्यावर युवराजला मित्र सोनू बनसोडे याचा फोन आला. मी बाहेर जातो असे म्हणून तो घरातून बाहेर पडला, पायी चालत तो मित्र विजय ऊर्फ सोनू बनसोडे आणि एक अल्पवयीन मुलगा या दोघांच्या मोटारसायकलवर बसून गेला.
    जीवधन किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; पुण्यातील तरुणासोबत आक्रित घडलं

    रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला

    दुपारी साडे तीनच्या सुमारास मित्रांसोबत गेलेला युवराज घरी परत आलाच नाही. सायंकाळ झाली तरी युवराज परत न आल्याने वडील आणि भाऊ नागेश यांनी शोध घेतला. रात्री १०.३० वाजता तो आणि त्याचे मित्र नेहमी बसत असलेल्या निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत गेले तेव्हा युवराज स्वामी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. युवराजचा मृतदेह पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. ताबडतोब सोलापूर पोलिसांना याबाबत माहिती देत तपास सुरू केला.
    बाईक बाजूला उभी करुन फोनवर बोलत होता तेवढ्यात भररस्त्यात चाकू हल्ला झाला, बस स्थानकात थरकाप उडवणारी घटना

    जुन्या भांडणाचा विषय निघाला अन् त्याला ठार केले

    तिघे एकमेकांचे मित्र होते. मात्र यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. रात्री दारू पिण्याचे नियोजन करून तिघे दुपारीच मोटारसायकलवरुन गेले होते. दारू पित असताना पूर्वीच्या भांडणाचा विषय तिघांमध्ये निघाल्यानंतर त्यात पुन्हा वाद झाला अन् दोघांनी स्टीलच्या स्टॅन्डने कपाळावर वार करून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    मित्राने फोन करुन बोलावलं, जुन्या भांडणाचा विषय निघाला आणि भर चौकात हत्याकांड; रिक्षा चालकासोबत भयंकर घडलं

    पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

    जोडभावी पेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी नागेश प्रभूलिंग स्वामी (वय १८ रा. शिवगंगा नगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून विजय ऊर्फ सोनू बनसोडे (वय १९ रा. आदर्श नगर, शेळगी) आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed