• Wed. Jul 22nd, 2026
    मीच जाऊन एकएकाला मारावं, असं वाटतं; आठवलेंसमोरच देशमुखांच्या पत्नीचा संताप अनावर

    Ramdas Athawale meets Santosh Deshmukh Family : वीस दिवस उलटूनही नातेवाईकांचं स्टेटमेंट पोलिसांनी अजूनही घेतलेलं नाही, याचंही मला आश्चर्य वाटतं, असं रामदास आठवले म्हणाले.

    Santosh Deshmukh : मीच जाऊन एकएकाला मारावं, असं वाटतं; आठवलेंसमोरच देशमुखांच्या पत्नीचा संताप अनावर, मला शासनाने सांगावं…

    दीपक जाधव, बीड : बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्व आरोपींना अटक केली पाहिजे, या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हा विषय मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील सांगणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. यावेळी संतोष देशमुख यांची पत्नी आणि आई भावनावश झाल्या होत्या. “असं वाटतं की एकेकाला जाऊन पकडून मारावं” अशा भावना संतोष देशमुख यांच्या पत्नीने व्यक्त केल्या.

    रामदास आठवले काय म्हणाले?

    वीस दिवस उलटूनही नातेवाईकांचं स्टेटमेंट पोलिसांनी अजूनही घेतलेलं नाही, याचंही मला आश्चर्य वाटतं, असं रामदास आठवले म्हणाले. महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे. आरोपींची केवळ प्रॉपर्टी जप्त करून केवळ चालणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

    आरोपी पकडायला एवढा वेळ लागतो ही चांगली बाब नाही. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे, असं सांगतानाच वीस दिवस उलटूनही अजून नातेवाईकांचे स्टेटमेंट घेतलं नाही याबद्दल आठवलेंनी आश्चर्य व्यक्त केलं.
    Balya Mama Mhatre : टोलनाक्यावर लांब रांगा, बाळ्या मामांचा पारा चढला, रस्त्यावर उतरुन टोलवाल्यांना धारेवर धरलं

    पत्नीचा संताप

    आता अक्षरशः मला तर वाटतं, की मीच जाऊन कुणाकुणाला मारावं, इतकी वेदना मला सहन होत नाही. काय केलं होतं आम्ही पाप, की आमच्यावर ही वेळ आलेली आहे? मला शासनाने सांगावं, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन, इतकी माझ्यात हिंमत वाटायला लागली आहे, असं संतोष देशमुख यांची पत्नी म्हणाली
    Chetan Tupe : ‘महाराष्ट्राच्या मनात आहे, ते दोन्ही पवार करतील’, शरद पवारांच्या भेटीनंतर दादांचा आमदार थेट बोलला

    आईला अश्रू अनावर

    जगात सध्या माझ्या देवासारखा माणूस कुठे भेटणार नाही. देव एकवेळ हयगय करेल, पण माझ्या माणसाने हयगय केली नाही, अशा भावनाही पत्नीने व्यक्त केल्या. काय करु, या हरिणीचं पाडस कसं ओढून नेलं या लोकांनी. आम्हाला संरक्षण द्यायला पाहिजे, असं म्हणत देशमुखांच्या मातोश्रींना रडू कोसळलं.

    Badlapur Crime : दिव्यांग असल्यामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला
    ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले
    Crime News : रिक्षातून जाताना उचललं, जबरदस्ती गुड्डू भैय्याच्या थारमध्ये डांबलं, वाळूचं कमिशन न दिल्यानं संतापनजक प्रकार; नेमकं काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed