Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम18 Dec 2024, 10:12 pm
गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटल्याची घटना घडली आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत ८० प्रवासी होते, त्यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नौदलाच्या स्पीड बोटनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानं हा अपघात घडल्याचं बोललं जातंय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेमागचं कारणं सांगितलं आहे.