• Fri. Mar 6th, 2026
    सावंतांनी बदलला डीपी, मंत्रिपद गेल्यानं नाराजी मोठी? धनुष्यबाण हटवला, नवा फोटो बराच बोलका

    Tanaji Sawant: मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा काल संपन्न झाला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    धाराशिव: मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा काल संपन्न झाला. गेल्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत आरोग्य मंत्री होते. आपल्या विधानांमुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी भाजपमधूनच बराच दबाव होता. अखेर सावंतांना डच्चू मिळाला. काल ते राजभवनावर फिकरले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या जोरदार चर्चा आहेत.

    महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तानाजी सावंत यांच्याकडे मंत्रिपद नव्हतं. ठाकरे सरकार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर सावंत यांना एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री केलं. त्यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा देण्यात आली. आता फडणवीस सरकारमध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाही. गेल्या २ दिवसांपासून त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यांनी फेसबुकवरील डीपी आणि प्रोफाईल कव्हर बदललं आहे.
    मला आदल्या रात्रीच मंत्रिपदासाठी फोन, पण…; डच्चू मिळालेल्या मुनगंटीवारांचा रोख कोणाकडे?
    तानाजी सावंत यांचं फेसबुकवर अधिकृत पेज आहे. तासाभरापूर्वी त्यांनी पेजवरील डीपी आणि कव्हर फोटो बदलला आहे. डीपीवर आधी सावंत यांचा हसरा फोटो होता. त्याखाली धनुष्यबाण चिन्हासह शिवसेनेचा उल्लेख होता. पण आता नव्या डीपीमध्ये केवळ बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. त्यावर शिवसैनिक असा उल्लेख आहे.

    तानाजी सावंत यांच्या फेसबुक पेजचं कव्हरदेखील बदलण्यात आलं आहे. आधीच्या कव्हर फोटोत संकल्प विकासाचा, निर्धार विजयाचा अशी घोषणा होती. सावंतांनी केलेल्या सामाजिक कामांचे फोटो होते. धनुष्यबाण चिन्ह होतं. आता त्याची जागा बाळासाहेबांच्या फोटोनं घेतली आहे. भगव्या वस्त्रांमधील बाळासाहेब, त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळ्या आणि शिवसैनिक असे शब्द कव्हरवर दिसत आहेत.
    लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून? पुरवणी मागण्यांच्या आकड्यांमधून महत्त्वाचे अपडेट
    तानाजी सावंतांना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली जाऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बराच दबाव होता. हा दबाव पक्षातील आमदारांसोबतच मित्रपक्ष असलेल्या भाजपमधूनही होता. स्वच्छ चारित्र्याचे, निष्कलंक नेतेच मंत्रिमंडळावेत यासाठी भाजप आग्रही होता. अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत या माजी मंत्र्यांविरोधात महायुतीमधूनच फिल्डींग लावण्यात आलेली होती. पैकी राठोड यांना मंत्रिपद मिळालं आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed