• Mon. Mar 16th, 2026

    तळेगावमधील तब्बल ३०० एकर क्षेत्रावर वक्फ बोर्डाचा दावा, १०३ शेतकऱ्यांना नोटीसा

    तळेगावमधील तब्बल ३०० एकर क्षेत्रावर वक्फ बोर्डाचा दावा, १०३ शेतकऱ्यांना नोटीसा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2024, 10:53 pm

    तिकडे दिल्लीमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयकावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच इकडे महाराष्ट्रातही वक्फ बोर्डाशी संबंधित एका प्रकारानं वातावरण तापण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील तळेगाव, तालुका अहमदपूर येथील तब्बल १०३ शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय. वक्फ बोर्डानं तशा नोटिसा या शेतकऱ्यांना पाठवून आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिसांमुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तळेगावमध्ये नेमकं काय घडतंय तुम्हीच पाहा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *