• Tue. Mar 10th, 2026

    चालकाचं नियंत्रण सुटलं, बस स्थानकातच तिघांना चिरडलं, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथराव खडसेंकडून दिलजमाईचे संकेत

    चालकाचं नियंत्रण सुटलं, बस स्थानकातच तिघांना चिरडलं, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथराव खडसेंकडून दिलजमाईचे संकेत

    Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर

    १. पंधराव्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शनिवारी १७३ आमदारांनी भारतीय संविधानाची एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. तर, मतदानयंत्र अर्थात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिला. त्यामुळे नव्याने सत्ताग्रहण केलेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ठिणगी पडली. महाविकास आघाडीचे आमदार आज, रविवारी शपथ घेणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…
    २. सामान्य तरुणांच्या बँक खात्यांचा गैरवापर करत १०० कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार केल्याचा ठपका ठेवत मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक (एनएएमसीओ) प्रकरणी सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागाने छापेमारी केली. मुंबईसह अहमदाबाद परिसरात झालेल्या छापेमारीत १३.५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

    ३. मुंबईमध्ये गेले दोन ते तीन दिवस उकाड्याने हैराण झाल्यानंतर शनिवारी दुपारनंतर वातावरणात फरक होत असल्याची जाणीव झाली. वातावरणात सकाळपासून दिलासा मिळण्यास सुरुवात झाली. दुपारची काहिली कमी झाल्याने डिसेंबर महिन्याचा सुखद अनुभव पुन्हा घेता येईल, याचा विश्वास मुंबईकरांमध्ये निर्माण झाला. पुढील तीन दिवस मुंबईतील किमान तापमान पुन्हा एकदा खाली उतरण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातही किमान तापमानात मोठी घट होईल, असा अंदाज आहे.

    ४. शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट होऊन शुक्रवारी सायंकाळी एका शिक्षकाचा मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी झाली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुरेश भिकाजी संग्रामे (रा. टोला सिरेगाव) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर नत्थू गायकवाड असे जखमी नातेवाइकाचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर…

    ५. ‘निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मतदारांमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानुसार लोकांनाच हा निकाल मान्य नाही,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. दरम्यान, आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रितच लढवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

    ६. विधानसभेच्या विशेष अधिवेशन सत्रात शनिवारी (दि. ७) जिल्ह्यातील पंधरापैकी १४ आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली. माजी मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ यांच्यासह नाशिक शहरातील आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे आणि ॲड. राहुल ढिकले यांनीही पहिल्याच दिवशी शपथ घेतली. शहरातील तीनही आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय श्रीराम’चा नारा दिला. तर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी मराठीऐवजी संस्कृतमध्ये शपथ घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.

    ७. नाशिक जिल्ह्यातील महामार्ग बसस्थानकात एक भीषण अपघात झाला आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने तीन जण चिरडले गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. बातमी वाचा सविस्तर…

    ८. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ खडसे यांनी त्यांच्याबद्दल केलेलं विधान चर्चेत आलं आहे. एकनाथ खडसे यांच्या विधानामुळे त्यांच्याकडून फडणवीस यांच्यासोबत दिल जमाईचे संकेत दिले आहेत. ॉजळगावात पत्रकारांसोबत बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि मी सोबत काम केलं आहे. आमच्यात काही तात्विक मतभेद कालही होते आजही आहेत आणि उद्या ते मतभेद मिटही शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले, आम्ही आजही एकमेकांशी बोलतो, असं एकनाथ खडेस म्हणाले.

    ९. मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. वांद्रे परिसरात एका २५ वर्षीय मॉडेलचा भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने धडक देताच चिरडून मृत्यू झाला. मॉडेल शिवानी सिंह तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना समोरुन येणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे.

    १०. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मनामध्ये एक इच्छा होती की, बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासलेला होता, सदा सरवणकर हे गेले तीस वर्ष राजकारणात आहेत त्यांना पाणी पाजायच होतं आणि त्यांचा माज उतरावयाचा होता, असं म्हणत त्यांनी सदा सरवणकर यांच्यावर टीका केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed