• Sat. Sep 21st, 2024
अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या

ठाणे : अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंडाना असे चार जणांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये तीन आरोपी दिल्लीत राहणारे असून सुपारी घेऊन हत्या करणारा एक आरोपी विधिसंघर्ष बालकअसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक रमेश झा (वय ४८) हे मूळचे दिल्लीचे असून ते अंबरनाथ एमआयडीसीमधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. ते अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वेदयनगर परिसरात आरोपी बायको सुमनदेवीसह दोन मुलांसह राहत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री सडे नऊ वाजल्याच्या सुमारास त्यांची अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील एका ढाब्या समोर भररस्त्यात कोणीतरी दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार २६ फेब्रुवारी रोजी मृतकचा २४ वर्षीय मुलाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिली.
साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता, घटनास्थळावरून दोन इसम पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता, दोन्ही मारेकरी रिक्षात बसून दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जातांना दिसले. त्यातच पोलिसांना तांत्रिक माहिती आणि बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी दिल्लीला पळून गेलेत पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला.

पोलिसांनी अटक आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, मृतक रमेश झा यांचा २५ वर्षांपूर्वी आरोपी बायकोशी विवाह होऊन दोन मुलं आहेत. त्यातच गेली १० वर्षापासून आरोपी बायको मुलांसह दिल्लीत राहत असताना तिचे धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंधातून अनैतिक संबध प्रस्थापित झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर २०२२ साली आरोपी बायको दिल्लीतील प्रियकराला सोडून अंबरनाथ शहरात नवऱ्याकडे राहण्यास आली. मात्र मृतक नवरा अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याचं आरोपी बायकोने तिच्या प्रियकराला सांगितले. त्यामुळे दोघांनी नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचून दिल्लीतील दोन गुंडांना हत्येची सुपारी दिली. त्यानुसार मृतक नवऱ्यावर मारेकऱ्यांनी दोन ते तीन दिवस पाळत ठेवली होती. विशेष म्हणजे दिल्लीतून आलेले तिन्ही आरोपी अंबरनाथ शहरातील एका लॉजवर मुक्कामाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी बायकोसह तिचा प्रियकर धर्मवीर गुप्ताने दिल्लीतील अटक दोन गुंडांना हत्येची सुपारी देताना काही रोख रक्कम तसेच जमीन जागेचे आमिष दिलीये, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि एक सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या अशा तिन्ही आरोपींना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एक आरोपी विधिसंघर्ष बालक असल्याने त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed