पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं?
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशी पोस्ट लिहित विरोधकांना आव्हानही केल्याचे दिसत आहे. दरम्यान यानंतर सर्व स्तरांतून यावर प्रतिक्रिया येत आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील संकेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली अन् निशाणी काय दिली तर “तुतारी”! एका योद्ध्याच्या हाती तुतारी दिली… या योद्धाचे नाव आहे, शरद पवार ! ८४ वर्षांचे शरद पवार, ते परत एकदा लढाईला उतरलेत. हा संकेत वेगळाच संदेश देऊन जातो. महाराष्ट्र युद्धासाठी तयार आहे. युद्ध अधर्माविरूद्ध आहे..अन् या युद्धाची तुतारी वाजवायचे काम निवडणूक आयोगानेच केलेय.
आता थांबायचे नाही लढायचे आणि जिंकायचे
अब रूकना नही, लढना है और जितना है!
