• Wed. Mar 18th, 2026
    २०१५ मध्ये ठाणे ते बोरिवली बोगद्याची घोषणा; मात्र पर्यावरण मंजुरीआधी भूमिपूजनाची तयारी, वाचा सविस्तर

    मुंबई: ठाणे ते बोरिवलीदरम्यानचे अंतर तासाभराने कमी होण्यासाठी उभ्या होणाऱ्या बोगद्याच्या भूमिपूजनाची केंद्रीय पर्यावरण मंजुरीआधीच तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भूमिपूजनासाठी तयारी सुरू करण्याची सूचना राज्य सरकार व प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
    पर्यटन क्षेत्रात महिलांचे सबलीकरण करण्याची योजना; महाराष्ट्राच्या ‘आई’ पर्यटन योजनेचे देशभरात विपणन
    घोडबंदर रस्त्यावरील भीषण वाहतूक कोंडीपासून मुक्तता देणाऱ्या ठाणे-बोरिवली व बोरिवली-ठाणे यादरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी २०१५ मध्ये बोगद्याची घोषणा केली होती. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या भागातून जाणारा असल्याने वनमंजुरी अत्यावश्यक असताना चार दिवस आधीच राष्ट्रीज वन्यजीव मंडळाने या १६ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. मात्र या प्रकल्पाला अद्यापही केंद्रीय पर्यावरण व वने विभागाची मंजुरी मिळालेली नाही. मात्र प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाली आहे.

    Valentine’s Day साठी वर्षभरापासून तयारी, प्रेमाचं प्रतीक मावळमधून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत

    या प्रकल्पाचे कंत्राट मेघा इंजिनीअरिंग कंपनीला देण्यात आले आहे. संबंधितांनुसार, प्रशासनाने या कंपनीला भूमिपुजनाच्यादृष्टीने तयार राहण्यास सांगितले आहे. हे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावेळी होईल, असे सांगितले जात आहे. मात्र अधिकृत पर्यावरण मंजुरी प्रकल्पाला मिळालेली नाही. हा प्रकल्प १८ प्रकारच्या संरक्षित वन्यजीवांच्या खालून हा बोगदा तयार होणार आहे. ठाणे ते बोरिवलीदरम्यान ५.७४ किमी व बोरिवली ते ठाण्यादरम्यान ६.०९ किमी लांबीचा आहे. दोन्हीकडील जोडरस्ता १.५५ किमीचा असेल. जवळपास १० किमीचा मार्ग अभयारण्याच्या २५ मीटर खालून जाणार आहे.

    चिन्मय काळे यांच्याविषयी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed