• Sat. Sep 21st, 2024
कोणाची जिरवायची माझ्यावर सोडा, अजितदादांच्या शिलेदाराला जवळ केलं, भाजप नेत्याला विखेंचा इशारा

शिर्डी : भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश कारखाना निवडणुकीत पराभव केला. मात्र आता विखेंनी आपला मोर्चा सासुरवाडी असलेल्या कोपरगाव मतदारसंघाकडे वळवला आहे. विवेक कोल्हेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचे भूमिपूजन करत त्यांना पाठबळ देत भाजपच्याच कोल्हें विरोधात विखेंनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हेंना अडचण निर्माण होण्याची शक्यता असून ते काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

मंगळवारी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नियोजित दौरा होता. त्यामुळे ते हेलिकॉप्टरने कोपरगावकडे निघाले, मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर लँड करता न आल्याने त्यांना पुन्हा मुंबईला जाऊन खाजगी विमानाने कोपरगावात यावं लागलं.

पार्थ पवारांचं राजकीय लाँचिंग, पण अजितदादांनी निवडलेल्या मतदारसंघावर चार ‘पक्षां’ची घारीसारखी नजर
कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात पालकमंत्री विखे यांनी आपल्या सासुरवाडीतून केली. संवत्सर गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं. यावेळी झालेल्या भव्य सत्कार सोहळ्याच्या मंचावर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष भाजपचे विजय वहाडणे, माजी जि प सदस्य राजेश परजणे हे उपस्थित होते. हे सर्वजण कोल्हे यांचे विरोधक समजले जातात. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणातून आशुतोष काळे यांची स्तुती करताना कोल्हे यांचं नाव न घेत त्यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांच्या ‘मित्रा’ला मलबार हिलचा बंगला, सरकारकडून १५ लाखांची कार, विरोधकांचा हल्लाबोल

जिरवायचं काम तुम्ही माझ्यावर सोडा

विकासासाठी चांगली दृष्टी असली पाहिजे, कोपरगावचा आमदार तरुण आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टी असून निश्चितपणे कोपरगाव तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आशुतोष काळे यांना माझं म्हणणं आहे, की त्यांनी चांगलं काम करावं. २४ तास लोकांना वेळ द्यावा, त्यांना जिथे तिथे शासनाची मदत लागेल, मी त्यांच्यासोबत आहे. जशी मोदी साहेबांची गॅरंटी तशी माझी तुम्हाला गॅरंटी आहे. तुम्ही चिंता कशाला करता? असे म्हणत विखेंनी आमदार काळेंना पाठबळ दिलं. तुम्ही राजकारण डोक्यातून काढून टाका याची जिरवायची, त्याची जिरवायची यात न पडता कोणाची जिरवायची हे काम माझ्यावर सोडा, असं म्हणत नाव न घेता विखेंनी कोल्हेंना अप्रत्यक्ष इशारा दिलाय.

दोन टक्के मतांमुळे सत्तापालट, महाराष्ट्रात निघालेल्या KCR यांचं तेलंगणातच पानिपत कसं झालं?

लाडाच्या जावयाचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यंदा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय दौऱ्याच्या निमित्ताने कोपरगाव येथील सासुरवाडीत पोहोचले. लाडाचा जावई सासुरवाडीत पोहोचतात संवत्सर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. शिर्डी कोपरगावसाठी एमआयडीसी मंजूर करून आणल्याने हजारो फुलांचा हार घालून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या पिछेहाटीला बाबा जबाबदार, विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed