• Sun. Mar 15th, 2026
    बारामतीत लोकसभेला पवार विरुद्ध पवार सामना होईल का? शरद पवारांचं ‘लोकशाही’वादी उत्तर

    पुणे : अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढविणार असल्याचं जाहीर करतानाच बारामतीच्या जागेवर दावा सांगितला. त्याचवेळी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाही आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का? असा सवाल विचारण्यात आला. यावेळी त्यांनी अत्यंत खूबीने उत्तर देत मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

    शरद पवार म्हणाले, “पवार विरुद्ध पवार कसं होईल. वास्तविक बारामतीच्या खासदार या सुप्रियाताई सुळे आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देतील तो निवडणूक लढवेल. शेवटी लोकशाही आहे. विरोधकांना त्यांची भूमिका घेऊन जनतेमध्ये जाण्याचा लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे. लोकांना काय सांगायचं याची चिंता त्यांना आहे. त्यामुळे ते वारंवार आम्हीच राष्ट्रवादी असल्याचं सांगत आहेत. मात्र लोकांना सत्य माहीत आहे. त्यामुळे मतदान करताना शेवटी जनता काय निर्णय घ्यायचा ते ठरवेल”.

    लोकसभा मतदारसंघाचा पीपीटी सादर, आढावा घेतला, चाचपणीला सुरूवात, दादांच्या दाव्यानंतर पवारांचा शड्डू ठोकला
    अजित पवार आणि त्यांच्या गटावर बोलताना शरद पवार म्हणाले, “पक्ष सोडणारे पुन्हा विधानसभेत दिसत नाहीत, याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. त्याचबरोबर माझ्याबरोबर किती आमदार आहेत, ते आज सांगणार नाही. ते योग्यवेळी सांगणार नरेंद्र मोदी यांनी भर सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. मोदींनी सिंचन घोटाळ्याचे हे आरोप नेमके कुणावर केले ते तुम्हीच शोधा, असा सूचक सवालही पवारसाहेबांनी पत्रकारांनाच केला. इंडिया बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या की दिल्लीत इंडियासंदर्भात बैठक होईल”

    विधानसभेत राष्ट्रवादी युवकची मोठी फळी निवडून जाईल… तरुणांच्या उमेदवारीवर पवार काय म्हणाले?
    शरद पवार साहेब म्हणाले की, योग्य मागण्यांसाठी आंदोलन करायला काहीच हरकत नाही. मात्र राज्यात सामाजिक ऐक्य जतन केलं पाहिजे. जाती-जातीमध्ये अंतर वाढायला नको, ही आमची भूमिका आहे. आंदोलकांनी त्यांची भूमिका मांडावी. त्यातून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

    नवीन पक्ष का नाही काढला? दादांच्या त्या व्हिडीओवरून आव्हाडांचा हल्ला, मुश्रीफांकडून प्रत्युत्तर
    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांना आम्ही मतं मागितली होती ती मतं भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. एवढंच नाही तर भाजप आणि त्यांच्या विचारधारेविरोधात होती. आमच्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा होता म्हणून आमचे लोक निवडून आले. त्यामुळे जो कार्यक्रम मांडला, भूमिका मांडली त्याच्याविरुद्ध काही सूचविले असेल तर ती लोकांशी फसवणूक आहे. त्यामुळे ते करणे योग्य नाही अशी भूमिका माझ्यासह अनेक सदस्यांची होती, असे शरद पवार यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed