इंदापूर: निरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात इंदापुर तालुक्यातील काझड हद्दीत दोन शेतकरी पडल्याची घटना बुधवारी (दि २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत असून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
लाकडी कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते. या पंपामधुन पाणी येणे बंद झाल्याने हे दोघे सदर ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले.अनिल नरुटे (वय ३५) आणि रतिलाल नरुटे (वय ५५) अशी बोगद्यात पडलेल्या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे चुलते पुतणे आहेत. दरम्यान, या दोघांचा शोध घेण्यासाठी, त्यांचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हे दोघेजण सायंकाळी उशीरानंतर देखील घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यांचा इतरत्र कोठेही शोध लागला नाही. घटनास्थळी असलेल्या दोघांच्या दुचाकीवरुन हा प्रकार लक्षात आल्याचे शिक्षक नाना नरुटे यांनी सांगितले.
लाकडी कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते. या पंपामधुन पाणी येणे बंद झाल्याने हे दोघे सदर ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले.अनिल नरुटे (वय ३५) आणि रतिलाल नरुटे (वय ५५) अशी बोगद्यात पडलेल्या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे चुलते पुतणे आहेत. दरम्यान, या दोघांचा शोध घेण्यासाठी, त्यांचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हे दोघेजण सायंकाळी उशीरानंतर देखील घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यांचा इतरत्र कोठेही शोध लागला नाही. घटनास्थळी असलेल्या दोघांच्या दुचाकीवरुन हा प्रकार लक्षात आल्याचे शिक्षक नाना नरुटे यांनी सांगितले.
दरम्यान, पाणी येत नसल्याने विद्युतपंपाची पाहणी करण्यासाठी खाली उतरत असताना तोल जाऊन दोघेजण ३०० फुट खोल बोगद्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने वालचंदनगर पोलिस प्रशासनाने घटनासस्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी याबाबत तहसिलदार श्रीकांत पाटील यांना आवश्यक सुचना दिल्या.
Read Latest Maharashtra News And Marathi News