• Tue. Mar 10th, 2026

    नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे पाऊल, एकाच दिवसात पोलीस स्टेशन उभारलं

    नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे पाऊल, एकाच दिवसात पोलीस स्टेशन उभारलं

    गडचिरोली: गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम वांगेतुरी एक हजार पोलीस जवानांच्या मदतीने एका दिवसात पोलीस स्टेशन उभे केले.पोलीस स्टेशनच्या माध्यमातून छत्तीसगड सीमेवरून जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यास व अबुजमाड मधील माओवाद्यांचा दहशत मोडून काढण्यासाठी मदत होणार आहे.

    दक्षिण गडचिरोली परिसर नक्षल कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील समजला जातो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस मदत केंद्रांची गरज आहे. त्यादृष्टीने गडचिरोली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वांगेतुरी येथे एका दिवसात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली. सोमवारी शेकडो पोलीस जवानांच्या मदतीने एका दिवसात हे पोलीस स्टेशन उभे केले. या परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षल्यांची हालचाल असते. या पोलीस मदत केंद्रामुळे नक्षली कारवायांवर अंकुश ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    वैतरणा नदीवर पुलाचे बांधकाम, परतताना कामगारांसोबत अनर्थ, बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना, दोघे बेपत्ता

    वायफाय सुविधेसह सुसज्ज असलेल्या या केंद्रात पोर्टा कॅबिन, मॅकवॉल, सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ४ अधिकारी, २५० अंमलदार, एसआरपीफ आणि सीआरपीएफचे अधिकारी व अमलदार असे ३०० पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहेत. यावेळी गावातील नागरिकांना पोलीसांच्या हस्ते विविध साहित्यांचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, आदी अधिकारी उपस्थित होते.

    एक हजार पोलीस जवानांच्या मदतीने छत्तीसगड सीमेवर एकाच दिवशी पोलीस स्टेशन उभं करण्यात आला आहे.हा परिसर म्हणजे नक्षल्यांचा गड आहे.लगतंच अबुजमाड परिसर लागून आहे त्या ठिकाणी माओवाद्यांची दहशत आहे.ती दहशत मोडून काढण्यासाठी या पोलीस स्टेशनची मदत होणार आहे.तसेच या परिसरात विकासात्मक काम करून येथील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय या भागातील नागरिक शासनावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणार नाही.

    -संदीप पाटील,पोलीस उपमहानिरीक्षक

    मुख्यमंत्री गडचिरोलीहून नागपूरला जात असताना नागभीडला थांबले, नागरिकांकडून दणक्यात स्वागत!

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed