• Mon. Mar 16th, 2026
    भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं, M.P मधनू आरोपींना अटक; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

    नागपूर : दिवाळीनिमित्त गावाला जाण्यासाठी कामाचे ६ हजार रुपये न दिल्यानेच माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊराव डेंगरे (वय ४८, रा. उंद्रा, ता. उमरेड) यांची हत्या केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली. राजू डेंगरे हत्याकांडात फरार असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी मध्य प्रदेशातील मंडला येथून अटक केली. सूत्रधार विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) व आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओडिशा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघेही ढाब्यावर काम करायचे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषकुमार आणि आदी या दोघांनाही राजू यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार रुपये घ्यायचे होते. राजू त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करायचे. त्यामुळे दोनवेळा त्यांच्यात वादही झाला. दिवाळी जवळ आली असतानाही राजू यांनी विशेषकुमारला पैसे न दिल्याने तो संतापला.

    बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मोदी सरकारकडून आदिवासींना मोठी भेट; २४ हजार कोटींची योजना सुरु करणार
    रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास विशेषकुमारने आदीच्या मदतीने आधी कापडाने राजू यांचा गळा आवळला. त्यानंतर विशेषकुमारने चाकूने वार करून राजू यांना ठार केले. राजू यांच्या अंगावर ब्लँकेट टाकले. त्यानंतर दोघेही त्यांची कार घेऊन पसार झाले.

    भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. मारेकऱ्यांच्या अटकेची सूत्रे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्वत:कडे घेतली. स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, साहाय्यक निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिष ठाकूर, उपनिरीक्षक बट्टूलाल, हेडकॉन्स्टेबल अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मयूर ढेकले, मृणाल राऊत यांनी हायटेक तपास सुरू केला. पोलिसांनी खबऱ्यालाही कामाला लावले. एका खबऱ्याने नियमितपणे ढाब्यावर जेवायला येणाऱ्या व विशेषकुमारच्या मित्राबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने विशेषकुमारचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. त्याआधारे पोलिस मंडला येथे पोहोचले. दोघांना अटक करून नागपुरात आणले. मारेकऱ्यांना कुही पोलिसांच्या स्वाधीन केले.

    कार सोडून ऑटोने आले बसस्थानकावर

    फरार होताना विहीरगाव पुलाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. नागरिकांनी दोघांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर पुन्हा कार घेऊन दोघे समोर गेले. पुन्हा कारचा अपघात झाला. त्यामुळे कार तेथेच सोडून दोघेही पायी विहीरगावजवळील पेट्रोलपंपाजवळ आले. तेथे त्यांना ऑटो दिसताच ऑटोने दोघेही रेल्वेस्थानकाजवळील मध्य प्रदेश बसस्थानकावर आले. तेथून पहाटे ५ वाजताच्या बसने दोघेही मध्य प्रदेशातील मंडला येथे गेले होते.

    Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार? मनोज जरांगेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed