• Sat. Sep 21st, 2024

रात्रपाळी केली, टपरीवर बसून चहा पीत होता, तेवढ्यात दोघं आले अन्… कारण वाचून हादराल

रात्रपाळी केली, टपरीवर बसून चहा पीत होता, तेवढ्यात दोघं आले अन्… कारण वाचून हादराल

नागपूर: गृहमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृहनगर असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असून हत्येची मालिका सुरूच आहे. याच मालिकेत आणखी एका हत्येची नोंद झाली आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बारसे नगरमध्ये एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. प्रेम त्रिकोणातून तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनव उर्फ शोकी रवींद्र भोयर (२२ बारसे नगर) असे मृत तरुणाचे नाव आहेत. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मृतक आणि आरोपी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. अभिनववर २०१८ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमाच्या त्रिकोणातून या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हा तरुण मेयो रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा. अभिनव व्यतिरिक्त घरात आणखी दोन भाऊ असून आई आणि वडील आहेत. मृतक अभिनव याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. हेच या हत्येचे प्रमुख कारण आहे. कारण, आता या तरुणीचे आरोपी कशिश महाजन नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. त्यामुळे मृतक आणि आरोपीमध्ये वाद झाला होता. याच वादामुळे सात महिन्यांपूर्वीही कशिशने अभिनववर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर दोघांमध्ये कोणताही वाद झाला नाही.

Nitin Desai: २५० कोटींचं कर्ज, नितीन देसाई अन् एनडी स्टुडिओतील अखेरची रात्र; आता कर्ज कोण फेडणार?
बुधवारी दुपारी अभिनव रात्रपाळीची ड्युटी संपवून बारसे नगर येथील टपरीवर बसून चहा पीत असतांना आरोपी कशिश महाजन हा त्याचा मित्र सायल महाजन आणि गौरव उर्फ गुल्या मासुरकर यांच्यासह अभिनव यांच्याकडे आला आणि त्यांनी अभिनवसोबत वाद घालण्यास सुरुवात केली त्यानंतर आरोपींनी आधी अभिनवला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, त्याचावर चाकूनेही हल्ला केला. या हल्ल्यात अभिनवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed