जयंत पाटील नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. मात्र, अजित पवार हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे याबाबत काही बोलायला हवे असे मला वाटत नाही, पण जोपर्यंत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची सध्याची गणिते कशी जुळतील हे सांगता येत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम असल्याने संपूर्ण कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यामुळे या आधारे अजित पवार मुख्यमंत्री होण्याची चर्चा करणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.
इर्शाळवाडी येथील घटना घडण्यापूर्वी येथील नागरिकांनी आम्हाला येथून हटवा असे सांगतले होते, दरड पडल्याने काही नुकसान होण्यापूर्वीच शासनाने उपाययोजना करायला हव्या होत्या, मात्र तसे न झाल्याने ही घटना घडली. मात्र आज सरकारी योजना तिथपर्यंत पोहोचत नाही. सरकार कुठेतरी अपयशी ठरत असून सरकारने आवश्यक ती सर्व मदत तातडीने देण्याची गरज असल्याचेही पाटील म्हणाले.
काँग्रेस पक्ष लवकरच विरोधी पक्षनेता जाहीर करेन
अजित पवार बंडखोरी करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. अजित यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस आमदारांच्या संख्येत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण, काँग्रेसने अजूनही विरोधी पक्षनेता निवडलेला नाहीये. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, येत्या काही दिवसांत काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर करेन”
पाटील पुढे म्हणाले की, “आमदारांच्या संख्येनुसार विरोधी पक्षनेता ठरवला जातो. सध्या काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे त्यांना नाव ठरवून सभापतींना कळवावे लागेल. येत्या दोन दिवसांत काँग्रेस नेत्याचे नाव निश्चित करेल आणि या आठवड्यापासून ते कामाला सुरुवात करतील, अशी मला आशा आहे.