तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. ते नेहमी घरी येत असल्याने एकमेकांची ओळख झाल्यानंतर त्याने तरुणीशी जवळीक साधली. तो तिला महागड्या भेटवस्तू देऊ लागला. यासोबतच तो नेहमी तिला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागला. त्यामुळे तिच्या आयुष्यात प्रकाश आला त्या वयात जेव्हा तिला प्रेम या शब्दाचा अर्थही माहित नव्हता. वडिलांचा मित्र आणि तिप्पट वयाने मोठा आसलेल्या प्रकाशही तरुणीच्या प्रेमात पडला. प्रकाशने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने तिला आपली पत्नी बनवून आनंदी ठेवण्याचे आमिष दाखवले. तिही वडिलांच्या मित्राच्या प्रेमात पडली. प्रकाश गुप्तपणे तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जाऊ लागला. प्रकाशचे प्रेम पाहून तिने त्याच्यासोबत घरातून पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकला.
२ सप्टेंबर २०१८ ला तिच्या वडिलांच्या मित्रासोबत मध्य प्रदेशात पळून गेली. दोघेही काही महिने मुलताई शहरात राहिले. तरुणी १८ वर्षांची झाल्यावर तिने प्रकाशशी लग्न केले. सध्या त्यांना आठ महिन्यांचे बाळ आहे. ती एका मैत्रिणीला भेटण्यासाठी यशोधरानगर येथे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली. शुक्रवारी दुपारी ती मैत्रिणीला भेटायला पोहोचली तेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर ती एका मुलाची आई असल्याचे निष्पन्न झाले.
अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. आता आरोपी प्रकाश यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मुम्मका सुदर्शन व एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साधन बजबळकर, मनीष पारये, दीपक बिंदाणे, नाना ढोके, हृषिकेश डुमरे, आरती चव्हाण, अश्विनी खोडपेवार यांनी केले.