• Sat. Sep 21st, 2024

स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

Aditya Thackeray Allegations On CM Eknath Shinde Over Water Logging In Mumbai : मुंबईत पावसाने एन्ट्री करताच अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने आता यावरून राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

eknath shinde and aditya thackeray
स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, आदित्य ठाकरेंचा टोला

हायलाइट्स:

  • पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं
  • मुंबईतील पाणी तुंबण्यावरून राजकारण सुरू
  • आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट ) नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई तुंबली याच ठिकाणी आपण बसून रस्त्याचे घोटाळे बाहेर काढले. ज्यांना अटक करायची आहे ती आपण आपलं सरकार आल्यानंतर कारवाई करूच. खडीचा घोटाळा बाहेर काढला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

१०० मिलिमीटर पावसात मुंबईमध्ये कधीच पाणी तुंबत नाही तिथे पाणी तुंबलं. यावेळी घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? मिधेंचं एक स्टेटमेंट वाचलं. पाऊस आल्याचं स्वागत करा, तक्रार काय करता? असं ते म्हणाले. निर्लज्ज सरकार आहे. मी आतापर्यंत इतका निर्लज्जपणा कधी पहिला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. दोन गोष्टींवर आपलं लक्ष वेधलं आहे. रस्ते घोटाळा आणि नालेसफाई. या सरकारने वेगवेगळी आश्वासनं दिली आहेत. दहीहंडीला हे खेळाचा दर्जा देणार होते. एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
Monsoon IMD Alert : मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल, आयएमडीकडून नवी अपडेट, ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी
रस्ते बांधकामात सहा हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. गेल्या दीड वर्षात पन्नास रस्ते एवढंच टार्गेट ठेवलं. हे सगळ्यात लहान टार्गेट आहे. ३१ मे पर्यंत आपली कामं पूर्ण होतात आणि तात्पुरते काम आपण साधार्णपणे बंद करतो. नागरिकांना त्रास होत आहेत. विनाकारण रस्ते खोदून ठेवले आहेत अशी लोकांची तक्रार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. जेवढ्या मिटिंग महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी झाल्या तेवढ्या बैठकाही यासाठी झाल्या असत्या तर असे स्टेटमेंट द्यायची वेळ आली नसती. जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मिंधे गटातील कोणी आला नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
Mumbai Weather : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: ऑरेंज अ‍ॅलर्ट मागे, पावसाबाबत आता हवामान विभागाकडून नवा इशारा
रात्रीची पाहणी करण्यासाठी आपण फिरलो होतो. उद्धव ठाकरे स्वतः नाले सफाईसाठी प्रत्येक विभागात जायचे. किती पंप चालू आहेत. किती नाहीत. कुठे पाणी साचेल, अशी सर्व आपण पाहणी करायचो. पंप वाढवले, असं घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले. पण ते कुठेही दिसले नाहीत, असं ते पुढे म्हणाले. जिथे जिथे पाणी तुंबलं आहे, तिथे आम्ही जायचो. आणि काम करून घ्यायचो. पण यांचं हे स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहाणी

कर्नाटकमध्ये जे सरकार होते ते ४० टक्के भ्रष्ट होते. हे १०० टक्के भ्रष्ट आहे. आज मुंबईमध्ये लोक प्रतिनिधी नाहीत. आमची पालिकेत सत्ता आली तेव्हा ६०० कोटी डेफिसिट होते. त्यानंतर आम्ही ७२ हजार कोटी सरप्लस आणले. आर्थिक नियोजन कोणाचे चांगले ते बघा. खड्डे होणार नाहीत, असा दावा जगात कोणी करू शकत नाही. पण यांनी केला. आता ३३ देश याची दखल घेतील. रस्त्यांसाठी ६ हजार कोटींचं टेंडर काढलं. पण कुठेही दिसले नाहीत, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed