• Thu. Mar 12th, 2026

    आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही, बकरी ईदवरून मुस्लिम बांधवांनी दिला एकतेचा संदेश

    आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही, बकरी ईदवरून मुस्लिम बांधवांनी दिला एकतेचा संदेश

    Ashadi Ekadashi And Bakri Eid Same Day Chhatrapati Sambhaji Nagar Muslims Have Taken A Big Decision : आषाढी एकादशी जवळ येत आहे. सर्व दिंड्या, वारकरी आणि विठ्ठल भक्त पुंढरपूरजवळ आहेत. पुढच्या काही दिवसांत आषाढी एकादशी असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. आषढी एकादशीला यावेळी बकरी ईद आहे. यामुळे सर्व परस्थिती लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश दिला आहे.

     

    आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद, कुर्बानी देणार नाही, मुस्लिम बांधवांनी दिला एकतेचा संदेश
    छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामुळे प्रत्येकाला विठ्ठलाची आणि आषाढीची आतुरता लागून आहे. मात्र यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरी होणार आहेत. मात्र, या सणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन बघायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे.गर्दीच्या पुणे मार्गावर केवळ पाच ई-बस; प्रवाशांचा प्रतिसाद पाहता गाडी संख्या वाढवण्याची गरज
    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये किरकोळ कारणावरून दंगली घडत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देणारा निर्णय घेतला आहे.
    शहरातील खानावळींच्या दरांना वाढीचा ‘तडका’,मासिक दरांमध्ये काही प्रमाणात वाढ
    आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय पंढरपूरसह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम एकता बघायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी कुठल्याही छोट्या-मोठ्या घटनांचे रूपांतर मोठ्या घटनांमध्ये होत असते. यामुळे पोलिसांच्या वतीने खबरदारी बाळगण्यात आली आहे.

    महाराष्ट्राचा सर्वात चांगला मुख्यमंत्री मी होऊ शकतो आणि हा सर्व्हे मीच केला; खासदार इम्तियाज जलीलांची टोलेबाजी

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीचे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि मधला मार्ग काढण्यासाठी बैठक झाली. यावेळी बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यावेळी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आगाव यांनी पुढाकार घेतला.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed