• Sun. Mar 8th, 2026

    मनाविरुद्ध लग्न, रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीसह आईला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं

    मनाविरुद्ध लग्न, रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीसह आईला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं

    जळगाव: कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचारी तरुणाने पत्नी आणि वृद्ध आईचा खून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी व आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत तरुणाने दोघींचा खून केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.आराध्या हेमंत भूषण (वय २३ वर्ष) असे मयत पत्नी तर सुशीलादेवी भूषण (वय ६३ वर्ष) असे मयत आईचे नाव आहे. या घटनेत आरोपीने मेहुण्यावर सुद्धा वार केले असून तो जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुहेरी हत्या प्रकरणी आरोपी हेमंत भूषण श्रवणकुमार (वय ३२) यास पोलिसांनी अटक केली असून त्याने खून केल्याची कबुली सुद्धा पोलिसांना दिली आहे.

    हेमंत श्रवणकुमार भूषण हा भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी यांच्यासह तो भुसावळ शहारातील वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये काही महिन्यांपूर्वीच वास्तव्यास आला होता. २ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे आराध्या हिच्यासोबत लग्न झाले होते. मात्र ती त्याला आवडत नसल्याने कुटुंबात वाद सुरू होते. त्यातून रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीचे सातत्याने खटके उडत होते.

    पत्नीचा खून करण्याचे नियोजन केल्याने रेल्वे कामासाठी वापरले जाणारे ब्रेक ब्लॉक हे लोखंडी साहित्य हेमंत याने घरात आणून ठेवले होते. मंगळवारी पहाटे दाम्पत्यात कडाक्याचे भांडण झाले. याच वादातून हेमंत याने मंगळवारी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास झोपेत असलेली त्याची पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी या दोघींच्या डोक्यात तसेच तोंडावर घरातील लोखंडी तवा मारला. या घटनेत आराध्या व सुशीलादेवी या दोघींचा जागीच मृत्यू झाला.

    बहिणीच्या लग्नानिमित्त माहेरी, पुण्यातील विवाहितेने आठ वर्षांच्या लेकासह आयुष्य संपवलं
    दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याने ते मिटवण्यासाठी मुंबईत सॉफ्टवेअर अभियंता असलेला हेमंतचा मेहुणा ऋषभ हा सोमवारीच भुसावळ शहरातील बहिणीच्या घरी आला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हेमंतने झोपेत असलेल्या ऋषभवरही लोखंडी तव्याने वार केले होते. त्याने हेमंतला पकडून ठेवलेले, मात्र हेमंतने त्याच्या तावडीतून सुटून पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी या दोघींचा जीव घेतला. अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर ऋषभ गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    स्थानिक पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या नेत्याची पुण्यात गोळ्या घालून हत्या

    घटनेची माहिती जखमी ऋषभ याने भुसावळ बाजारपेठ पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचारी घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून खुनाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर आरोपी हेमंत श्रवण कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने कशासाठी खून केला याची पोलिसांना कबुली दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    सात जणांच्या कुटुंबाची कार पुराच्या पाण्यात अडकली, काही क्षणातच नको ते घडलं!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed