• Sat. Sep 21st, 2024
मोदी शहांचा खुळखुळा बंद, देवेंद्रजी पैज लावतो-केंद्रातलं सरकारही जाणार, राऊतांचा शंखनाद

मुंबई : सामान्य जनता हुकुमशहांचा पराभव करू शकते. भाजपचे लोक धमक्या, दडपशाही करत होते. कर्नाटकमधील भाजपचा पराभव देशवासीय साजरा करत आहेत. या पराभवातून दिल्लीने धडा घ्यावा. मोजकी राज्य सोडली तर भाजपकडे आता राज्ये नाहीयेत. गुजरात, उत्तर प्रदेश यावर दिल्ली जिंकता येत नाही. आम्ही भाजपच्या पराभवाचे पेढे वाटतो, सामान्य माणसाने भाजपचा पराभव केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही खेळणी आता चालणार नाही. ईडीच्या धमकीने कुणी बधणार नाही. देवेंद्रजी- मी पैज लावून सांगतो २०२४ ला मोदींचं सरकार पुन्हा सत्तेत येत नाही, अशी भविष्यवाणीच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी प्रसादरमाध्यमांशी संवाद साधताना सामान्य जनतेने खोकेवाल्यांचा केलेला हा पराभव आहे, असं त्याचं विश्लेषण केलं. लोकांना धाकात ठेवाल, दडपशाहीत ठेवायला जाल, तर लोक मतपेटीतून तुम्हाला उत्तर देतीलच, आज तेथील जनतेने भाजपचा पराभव करुन लोकशाही वाचवली असल्याचं राऊत म्हणाले.

Karnataka Election : तुरुंगात टाकलं, दिल्लीत नेऊन एकटं पाडलं, पण ‘काँग्रेसचा चाणक्य’ अख्ख्या भाजपला पुरुन उरला
कर्नाटकच्या भाजपच्या पराभवाचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार नाही या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर बोलताना राऊत म्हणाले, फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे. त्यांच्या संगतीला असलेल्यांना राजकारण कळत नाही. काँग्रेसच्या विजयाचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल.

काँग्रेसच्या लाटेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो पराभव झाला, त्यावर बोलताना राऊत म्हणाले, खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीला जिंकता आलं नाही, भाजपा नतद्रष्ट आहे. तिथे प्रचाराला गेले नसते तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जिंकले असते. भाजपामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार हरले.

Karnataka Election Result: निपाणीत पवारांच्या सभेने काँटे की टक्कर, शेवटपर्यंत झुंजायला लावलं, पण अखेर भाजपचा गुलाल
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, जिथे जिथे प्रचाराला गेले, तिथे त्यांचे उमेदवार पराभूत झाले. म्हणजेच मोदी, शाह यांचा खुळखुळा आता चालणार नाहीत. २०२४ मध्ये मोदी सरकार जाणार हे मी फडणवीस यांना पैजेसकट सांगतो, असं चँलेंजही राऊत यांनी दिलं. त्याचवेळी बजरंगबली कर्नाटकच्या जनतेच्या बाजूला उभा राहिला, सत्याच्या बाजूने उभा राहिला. बजरंबलीलाच १४० जणांचं बळ मिळालं. गदा राहुल गांधींच्या खांद्यावर आहे, असं राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed