• Mon. Mar 9th, 2026
    धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग, चौघी जणींचा होरपळून मृत्यू, दोघी गंभीर

    धुळे :धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत.वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्त्या या कारखान्यामध्ये बनवल्या जात होत्या. या दरम्यान आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागली. या आगीत होरपळून चौघी महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    मयत मजूर हे जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५ वर्ष) आणि राजश्री भैया भागवत (वय १५ वर्ष), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चौघींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

    जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही
    चौकशीतच आगीच नेमकं कारण समोर येणार असल्याचं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून, बाकीच्या जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    मला जाणवलं घराला आग लागली आणि…; १३ वर्षाच्या मुलीनं धुमसत्या आगीतून पाच भावंडांचा जीव वाचवला

    या मयत महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास आता पोलिस वेगाने करत आहेत.

    महाराष्ट्र भूषण सोहळा: सोलापूरच्या महिलेचा उष्माघाताने बळी, लेकीचा मृतदेह पाहून आईचा हंबरडा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed