• Sat. Sep 21st, 2024

दुर्दैव! अचानक पाऊस आला, ती धावत-धावत वाळत घातलेले कपडे काढायला गेली, तिथेच घात झाला…

दुर्दैव! अचानक पाऊस आला, ती धावत-धावत वाळत घातलेले कपडे काढायला गेली, तिथेच घात झाला…

नाशिकःअककाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले आहे. एकीकडे विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या वादळी वाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे आता मनुष्यहानी देखील होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात रामपूर पूतळेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वीज पडून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैशाली विजय कवडे असे मृत महिलेचे नाव आहे.कपडे काढायला गेल्या अन् घात झाला

या बाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी वैशाली कवडे पाऊस आल्याने घराच्या अंगणात लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने वैशाली यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

मॉलमध्ये चार वर्ष घरासारखा राहिला, कुणाला पत्ताही लागला नाही; एक चूक अन् असा झाला भांडाफोड
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन पोरं मायेला मुकले

दरम्यान, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून घटनेची माहिती वावी पोलिसांना देऊन या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. वैशाली कवडे यांच्या दुर्दैवी मृत्युने कवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पती आणि सासू असा परिवार आहे. वाळत घातलेले कपडे घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा वीज पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान अन् बत्तीही गुल, शेतकरी पुन्हा अडचणीत

आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला जात आहे. अनेक ठिकाणी पोल्ट्री शेडपडून पक्षांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी नागरिकांचे राहते घर उध्वस्त झाले आहे. अशातच दुर्दैवी बाब म्हणजे पावसामुळे जीवितहानी देखील झाली आहे.
एन्काउंटरच्या आधी असद अहमद दीड महिने महाराष्ट्रात, काही दिवस पुण्यात मुक्कामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed