• Sat. Sep 21st, 2024

कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उत्तर देताना सत्तारांचं धक्कादायक विधान

कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उत्तर देताना सत्तारांचं धक्कादायक विधान

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे यातील तीन शेतकरी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. याचविषयी कृषिमंत्र्यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी अतिशय धक्कादायक वक्तव्य केलंय.

मागील आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलंय. या नुकसानीची पाहणी आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांनी संवाद साधला. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही, असं सांगताना जिथे नुकसान झालंय तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले.

शिवरायांबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांची कडक अ‍ॅक्शन
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायेत. विशेषत: तुमच्याच मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले, “शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहे”

माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही. वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही सत्तार यांनी सांगितलं.

आठवलेंचा लोकसभा मतदारसंघ ठरला, इच्छाही बोलून दाखवली, सेना खासदाराचं टेन्शन वाढलं
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील अंधारी गावात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भागिनाथ बाळूबा पांडव (वय ४६ वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय ५५ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.

परभणी जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीये. अशोक भिका शिरसाट असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. दुसऱ्या घटनेत कर्जबाजारीपणाला कंटाळून खुलताबादच्या दरेगाव आणि वैजापूरच्या बेंदवाडीच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटनाही समोर आलीये. शंकर अंबादास गायकवाड (वय ३५ वर्षे) आणि राजूसिंग लालसिंग बेडवाळ (वय ४० वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत. आता सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील सुरज उदयसिंग सेवगन ( वय 25 वर्षे) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed