“बायकोचं कुंकू पुसून आम्ही मुंबईला चाललोय”, असं म्हणत मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर मुंबईकडे निघण्यासाठी सज्ज झाले आहेत. आरक्षणासंदर्भातील मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईहून परतणार नाही, असा इशारा खानापूर येथील सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.