Mumbai Chembur Boyfriend Killed Girlfriend : मुंबईच्या चेंबूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. यात चारित्र्याच्या संशयातूनप्रेयसीची हत्या करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं?
माहुल येथील मैसुर कॉलनी परिसरात घरकाम करणाऱ्यांची एकत्र राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशीष मगर (वय २५), विष्णूमाया (वय १९) तिची काकू भीमा हे सर्व तेथे एकत्र वास्तव्यास होते. २५ ऑगस्ट रोजी रात्री विष्णूमाया हिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांचे पथक म्हैसुर कॉलनीत पोहोचले आणि विष्णूमायाचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात आशीष तसेच इतरांनी दिलेल्या माहितीनुसार काहीच संशयास्पद वाटत नसल्याने पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.
Nepal Flood : ‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’; नेपाळमधून 37 जणांचा गृप मुंबईत परतला, पोहोचताच कुटुंबीयांना पाहून ढसाढसा रडले, भयावह आपबिती सांगितली
चौकशीचा फास आवळला
शवविच्छेदन अहवालात विष्णूमाया हिच्यावर विषप्रयोगझाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरसीएफ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. विष्णूमाया काम करीत असलेले ठिकाण, तिच्या परिचयातील व्यक्ती यांची चौकशी केली असता आशीष आणि तिच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी आशीषभोवती चौकशीचा फास आवळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आशीषला अटक केली.
दुसऱ्या मित्रासोबत दिसली अन् वाद
मिळालेल्या माहितीनुसार, 25 तारखेला विष्णूमाया तिच्या दुसऱ्या मित्रासोबत असताना तिच्यात आणि अशिष मगर यांच्यात वाद झाला होता. वाद थोडा शांत झाल्यानंतर अशिषने तिला शीतपेय प्यायला दिलं. त्यात विष असले याची कोणतीही कल्पना नसणाऱ्या विष्णूमाया ते प्यायली खरी पण ते पिताच तिला त्रास सुरु झाला, अचानक उलट्या होऊ लागल्या. सुरवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं. पण जेव्हा त्रास वाढला आणि ती चक्कर येऊन पडली तेव्हा मात्र त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी तिला आधी खासगी आणि मग शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र तिला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं.
Sanjay Raut: सिंहस्थात 25 हजार कोटींची उधळपट्टी, संजय राऊत यांचा मंत्री-अधिकाऱ्यांवर आरोप
प्रेमाचा दुर्दैवी शेवट, घटनेनं चेंबूरमध्ये मोठी खळबळ
दरम्यान, अशिषने आपल्याला शीतपेय दिल्याचं आणि त्यांनंतर आपल्याला त्रास सुरू झाल्याचं तिने सांगितल्यानंतर ही बाब घरच्यांनी पोलिसांना सांगितली. सुरवातीला अशिषने पोलिसांची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला. पण पोलीसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर डॉक्टरांनी देखील विषबाधेने तिचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तवला आहे. अशिषला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या घटनेनं चेंबूरमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रेमाचा दुर्दैवी शेवट झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
