• Wed. Aug 19th, 2026

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: खड्ड्यामुळे दुचाकी घसरून टेम्पोखाली आल्याने दहा वर्षांच्या चिमुरड्याचा वडिलांच्या डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याच्या घटनेनंतरही रस्त्यांच्या दुरवस्थेवरून जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ‘रस्ते आहेत तर अपघात होणारच,’ असे वादग्रस्त वक्तव्य आमदार शंकर मांडेकर यांनी केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

म्हाळुंगे येथील नांदे-म्हाळुंगे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात रिषभ संदीप पाटोळे (वय १०, रा. राजयोग सोसायटी, ठाकरनगर, माण) याचा मृत्यू झाला. वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून तो शिकवणीला जात होता. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आणि रिषभ थेट टेम्पोखाली आला.

Pune Crime : सिंहगडावर विकृतांचा तरुणींना चुकीचा स्पर्श, पुण्यात पर्यटकांचा दावा, तुफान गर्दीच्या बहाण्याने असभ्य वर्तन‘तरी प्रश्न सुटत नाही’

वाद वाढल्यानंतर आमदारांनी रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादनाचा अडथळा असल्याचे सांगितले. सुस, नांदे, माण आणि म्हाळुंगे परिसरातील रस्त्यांचे भूसंपादन टीपी स्कीम, तसेच सातबारा नोंदींच्या प्रश्नामुळे रखडल्याचा दावा त्यांनी केला. ‘या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे. मी स्वतः तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विधिमंडळात हा प्रश्न मांडत आहे; मात्र सरकारच्या पातळीवर प्रश्न सुटत नाही. मी तरी काय करणार?’ अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.

संतप्त नागरिकांचा घेराव

अपघातानंतर मंगळवारी संतप्त नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांना घेराव घालून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जाब विचारला. त्या वेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ‘फ्लॅट घेताना इथले रस्ते कसे आहेत, हे पाहिले नव्हते का?’ असा सवाल आमदारांनी केल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, पत्रकारांनी रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची जबाबदारी आणि या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ‘रस्ते आहेत म्हटल्यावर अपघात होणारच; लहान गाडी आडवी आली की मोठ्या गाडीवरच गुन्हा दाखल होतो,’ अशी भूमिका मांडेकर यांनी मांडली. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीही त्यांनी आक्रमक पद्धतीने संवाद साधल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

Maharashtra TimesGanesh Bidkar: पुणे पालिकेत महायुतीत ठिणगी; ‘युती फक्त राज्यात’ म्हणत गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशाराचिमुकल्याचा अपघाती मृत्यू

पिंपरी : शिकवणीला जाण्यासाठी वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून निघालेल्या अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी नांदे-म्हाळुंगे रस्त्यावर घडली. रिषभ पाटोळे (वय १०, रा. माण, हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील संदीप पाटोळे (वय ३८) यांनी बावधन पोलिसांत फिर्याद दिली. टेम्पो चालकाविरुद्ध बावधन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोळे यांचे वाहन खड्ड्यात आदळून घसरले. या वेळी रिषभ शेजारून जाणाऱ्या ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed