Mumbai Navy Sailor Family Death : एका आठवड्यापूर्वी ओमाचे वडील तिला परत नेण्यासाठी मुंबईला आले होते. मात्र, नौदल जवान पूरणमल यांनी नकार देत सांगितलं की, तिला जायचं असेल तर ती जाऊ शकते, पण मुलांना तिच्यासोबत जाऊ देणार नाही
नौदल अधिकारी (डावीकडे), तर मयत पूरणमल यांचा मोठा भाऊ ब्रिजबाल मेहरा (उजवीकडे)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरातील नेव्ही नगर येथील निवासस्थानी शनिवारी रात्री भारतीय नौदलातील ३० वर्षीय खलाशी, त्याची पत्नी आणि दोन मुले मृतावस्थेत आढळली. प्राथमिक माहितीनुसार पूरणमल शंभूलाल मेहरा यांनी पत्नी ओमा (२८), तीन वर्षांचा मुलगा दर्श आणि दोन महिन्यांची मुलगी यांना जेवणातून विष देऊन ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र फॉरेन्सिक आणि शवविच्छेदनाचे सविस्तर अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. पत्नीसोबत असलेल्या वैवाहिक तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
राजस्थानचे कुटुंब मुंबईत
मेहरा कुटुंब मूळचे राजस्थानचे होते. पूरणमल यांचा धाकटा भाऊही भारतीय नौदलात कार्यरत आहे, मात्र तो मुंबई शहराच्या बाहेरील भागात तैनात आहे. जे. जे. रुग्णालयातून चौघांचं शव ताब्यात घेण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला.
वडिलांना काळजी, कंट्रोल रुमला फोन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरणमल यांच्या वडिलांनी रात्री त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी नौदलाच्या नियंत्रण कक्षाला याची सूचना दिली. नौदलाचे अधिकारी मेहरा यांच्या निवासस्थानी पोहोचले असता, त्यांना पूरणमल लिव्हिंग रुममध्ये आणि त्यांची पत्नी व मुले बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कफ परेड पोलिसांना याची माहिती दिली.
Mumbai News : बेस्ट बसच्या धडकेत हेमंत जोशींचा अंत, कुटुंबाला आठ वर्षांनी न्याय, 5.25 कोटींची रक्कम दोन महिन्यात देण्याचे BMC ला आदेशसर्वांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्या चौघांनाही मृत घोषित करण्यात आले. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाने घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले. घराची झडती घेतली असता कोणतीही मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली नाही. फॉरेन्सिक तपासणीदरम्यान विष किंवा तत्सम कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
ओमाचे वडील न्यायला आलेले
शेजारी आणि कुटुंबाच्या ओळखीच्या व्यक्तींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत पोलिसांना समजले की, या जोडप्याचे लग्न होऊन चार-पाच वर्षे झाली होती आणि त्यांच्यात कौटुंबिक कलह व वारंवार भांडणे होत होती. “एका आठवड्यापूर्वी ओमाचे वडील तिला परत घेऊन जाण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, पूरणमल यांनी नकार दिला आणि सांगितले की, जर तिला जायचं असेल तर ती जाऊ शकते, पण मुलांना तिच्यासोबत जाऊ देणार नाही. या जोडप्यांमधील वादाचे नेमके कारण काय होते, याची आम्ही चौकशी करु,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
चौघांच्या मृत्यूचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलीस कुटुंबीय, शेजारी आणि इतर संबंधित साक्षीदारांचे सविस्तर जबाब नोंदवत आहेत. जे. जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनात पूरणमल यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, फॉरेन्सिक आणि रासायनिक विश्लेषणाचे अहवाल प्राप्त होईपर्यंत, ओमा आणि त्या दोन मुलांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत वैद्यकीय पथकाने आपले मत राखून ठेवले आहे.
Pune Crime : सिंहगडावर विकृतांचा तरुणींना चुकीचा स्पर्श, पुण्यात पर्यटकांचा दावा, तुफान गर्दीच्या बहाण्याने असभ्य वर्तनकफ परेड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने ‘दुर्दैवी’ अशा शब्दात या घटनेचे वर्णन केले आणि सांगितले की, मुंबई पोलिसांच्या तपासात नौदल पूर्ण सहकार्य करत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा