• Mon. Aug 10th, 2026

    Highway Accident Cases: महामार्ग बनले मृत्यूचे सापळे! अडीच वर्षांत 355 जणांचा बळी, 492 जण गंभीर जखमी, पुणे-नाशिक महामार्ग सर्वाधिक धोकादायक

    म.टा.प्रतिनिधी, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतून जाणारे मुंबई-बेंगळुरू, जुना पुणे-मुंबई, पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर हे चारही महामार्ग अपघातांचे हॉटस्पॉटठरत आहेत. गेल्या अडीच वर्षांत या चार महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये ३५५ जणांचा मृत्यू झाला असून, ४९२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर यांसह चाकण, तळेगाव, भोसरी आणि हिंजवडीतील औद्योगिक व आयटी क्षेत्राशी जोडणारी वाहतूक याच मार्गांवरून होते. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याच्या आणि सायंकाळी काम सुटण्याच्या वेळेत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो. या गर्दीत वेगमर्यादा ओलांडणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, अचानक लेन बदलणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे यांसारख्या प्रकारांमुळे अपघातांची तीव्रता वाढत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अवजड वाहनांचा धोका निर्माण होत आहे.

    Pune News : दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोपपुणे-नाशिक महामार्ग

    सर्वाधिक धोकादायक

    शहरातून जाणाऱ्या चारही महामार्गांमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. २०२४मध्ये या मार्गावर ५१, २०२५मध्ये ५३ आणि यंदा जूनअखेर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरही यंदा जूनअखेर २० जणांचा बळी गेला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील मृत्यूंची संख्याही चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, यंदाचे वर्ष अद्याप निम्म्यावर असतानाच चारही महामार्गांवरील मृत्यूंचा आकडा ६६ वर पोहोचला आहे.

    सकाळी, सायंकाळी घटना

    औद्योगिक पट्ट्यांमध्ये सकाळी आणि सायंकाळी शिफ्ट बदलाच्या वेळी दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांची संख्या झपाट्याने वाढते. त्याचवेळी महामार्ग ओलांडणारे पादचारी आणि रस्त्याच्या कडेला थांबणारी वाहने यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

    Maharashtra TimesPune Crime: आई गावी गेलीय; आधी माऊलीला संपवलं, नंतर बॉडी तशीच ठेवून घराला कुलूप ठोकलं; अखेर फुटलं पुण्यातील घटनेचं बिंग!ब्लॅक स्पॉटवर तातडीने उपायांची गरज

    महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’चे शास्त्रीय पद्धतीने परीक्षण करून त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे. प्रभावी प्रकाशयोजना, स्पष्ट दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, वेग नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा आणि नियमित वाहतूक तपासणी यावर भर देण्याची आवश्यकता आहे. औद्योगिक भागातील शिफ्टच्या वेळेनुसार वाहतूक नियोजन केल्यासही अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

    महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई आणि ‘ब्लॅक स्पॉट’चे नियमित परीक्षण केले जात आहे. त्यासोबतच वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर आहे. मात्र, प्रशासन आणि पोलिसांच्या उपाययोजनांबरोबरच वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, लेन शिस्त पाळणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.-विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड

    अपघातांची प्रमुख कारणे…
    -भरधाव वेग आणि वेगमर्यादेचे उल्लंघन
    -अचानक लेन बदलणे; चुकीचे ओव्हरटेक
    -मोबाइलवर बोलत वाहन चालविणे
    -मद्यप्राशन करून वाहन चालविणे
    -अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ
    -दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर टाळणे
    -रात्री थकलेल्या अवस्थेत वाहन चालविणे
    -पावसाळ्यात निसरडा रस्ता आणि कमी दृश्यमानता

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed