Maharashtra Free Saree Scheme Closed: ही योजना २०२३ ते २०२८ अशा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, कालावधी पूर्ण होण्याआधीच ही योजना बंद करण्यात आली आहे.
शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा, वयोश्री, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन, शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा अशा अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व योजना एकापाठोपाठ बंद केल्या आहेत. आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सणाच्या वेळी दर वर्षी एक साडी देण्याची योजनाही बासनात गुंडाळण्यात आली आहे.
Harshwardhan Sapkal: वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर लाडक्या अदानीसाठी; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
वस्त्रोद्योग विभागाने २ जून २०२३ रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेल्या एका साडीचे (प्रतिकुटुंब) मोफत वाटप करण्याची योजना नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. योजनेच्या अंतर्गत राज्य यंत्रमाग महामंडळाने एक साडी ३५५ रुपयांना खरेदी केली; तसेच या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमालीसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात आला.
गरीब कुटुंबांना सणासुदीच्या काळात अत्यंत मोलाचा आधार ठरणाऱ्या या योजना अचानक बंद झाल्याने सर्वसामान्य जनतेत आणि विशेषतः अंत्योदय शिधापत्रिका धारकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. तसेच, स्थानिक विणकर आणि यंत्रमागधारकांनाही यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण या योजनेद्वारे त्यांच्या यंत्रमागावर विणलेल्या साड्यांना थेट हक्काचे मार्केट (कॅप्टिव्ह मार्केट) मिळत होते.
Devendra Fadnavis Eknath Shinde: दिल्लीत जाणार का, मुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार
आर्थिक भाराचे कारण
वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजना, विविध घटकांना दिले जाणारे अर्थसाह्य, प्रस्तावित योजनांचा आर्थिक भार आणि इतर दायित्वे यांचा विचार करता कॅप्टिव्ह मार्केट योजना पुढील आर्थिक वर्षात सुरू ठेवणे सयुक्तिक दिसत नसल्याने मोफत साडीची योजना २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात येत आहे, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.
