• Wed. Jul 15th, 2026

    Pik Vima Yojana: जोखमीच्या हंगामात आता राज्यात सुधारित पीक विमा योजना, ३१ जुलैपर्यंत नोंदणी सुरू

    Pik Vima Yojana: जोखमीच्या हंगामात आता राज्यात सुधारित पीक विमा योजना, ३१ जुलैपर्यंत नोंदणी सुरू

    ‘एल निनो’मुळे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. खरीप व रब्बी हंगामात वाढलेल्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुधारित ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप व रब्बी हंगामात अधिक जोखीम असल्यामुळे राज्यात सुधारीत ‘ प्रधानमंत्री पीक विमा योजना ’ लागू करण्यात आली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यासाठी नेमलेल्या कंपन्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

    ‘एल निनो’च्या प्रभावामुळे खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पेरणीला उशीर झाला असून अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांची उत्पादकता घटणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात खरीप २०२६ व रब्बी हंगाम २०२६-२७ या वर्षासाठी ८०:११०, कप व कॅप मॉडेलनुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन उत्पादनावर आधारीत सुधारीत ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे. पीक विमा नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. योजनेमध्ये शेतकरी सहभागासाठी प्रतिअर्ज किमान ०.१० हेक्टर करणे बंधनकारक आहे. खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात येत आहे.

    खरीप हंगामासाठी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाआधारे किंवा तांत्रिक उत्पादन आधारे महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. बनावट किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळूल्यास पाच वर्षे बंदी घालण्यात येईल, असे कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी सांगितले.

    खरीप हंगामासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जालना जिल्ह्यासाठी युनायडेट इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि बीड जिल्ह्यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आल्या आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा