तुकाराम मुंढे IAS अधिकारी असले तरी आपल्या कामाचा कुटुंबावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. खरंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे काम करत असताना आपल्याला सातत्याने कामाचाच विचार असतो. असं असलं तरी कुटुंबाची सुद्धा आपल्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना आपल्या कामाचा कुटुंबावर नेमका काय परिणाम पडतो? याबाबत तुकाराम मुंढे यांनी मनमोकळेपणाने मत मांडलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे IAS अधिकारी आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा यासाठी तुकाराम मुंढे गेल्या अनेक वर्षांपासून आपली सेवा देत आहेत. तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाचे सध्या राज्याचे आयुक्त आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी गुटखा माफीयांच्या विरोधात बेधडक मोहीम राबवली. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ, दूध, थंड पेये हे चांगल्या दर्जाचे मिळावेत यासाठी अनियमितता करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.
तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमुळे अनियमितता करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे ज्या खात्याची जबाबदारी स्वीकारतात त्या खात्यात पारदर्शकता आणण्यासाठी स्वत:ला झोकून देतात. नियमांचे काटेकोर पालन करणारे तुकाराम मुंढे वैयक्तिक आयुष्यात आपल्या कुटुंबाप्रती खूप हळवे आहेत. सातत्याने होणाऱ्या बदल्यांमुळे आपल्या कुटुंबावर आणि विशेषत: मुलाच्या आयुष्यावर काय परिणाम पडतो? या विषयी तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत मनमोकळपणाने माडलं आहे.
बदल्यांमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो?
“सातत्याने बदल्यांमुळे कुटुंबावर परिणाम नक्की होतो. मुलाच्या अनेक शाळा बदलाव्या लागल्या. त्यामुळे त्याचे मित्र झाले नाहीत. हा परिणाम नक्की होतो. माझ्यामुळे कुटुंबाला हा त्रास नक्की सहन करावा लागतो. पण एक जनतेचा सेवक म्हणून मी या गोष्टीचा बाहू करण्याची आवश्यता मला वाटत नाही. पण कुठेना कुठे त्याची खंत नक्की असते”, अशी भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.
‘मी सुद्धा माणूस’
“भावना असतात, तीव्र भावना असतात. पण ज्यावेळेस तुम्ही एक पब्लिक सर्व्हंट म्हणून काम करत असतात, ती भूमिका मी घेतलेली आहे. सुदैवाने माझ्या कटुंबाने मला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करु शकतो. त्याचे काही परिणाम कुटुंबावर होतात त्याची जबाबदारी मला कुटुंबप्रमुख म्हणून माझी आहे. माझ्यामुळे त्यांना जे परिणाम भोगावे लागतात, ती मला रिक्टेफाय करता येणे शक्य नाही”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
“सर्व गोष्टींबाबत भावना आहेत. मी सुद्धा माणूस आहे. यंत्रमानव नाहीय. त्यामुळे इमोशन्स नक्की आहेत. पण इमोशन्सच्या आहारी न जाता रॅशनल विचार करुन आपल्याला जी भूमिका पार पाडायची आहे, त्या दृष्टीने पुढे जाण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यात यशस्वी होतो की होत नाही किंवा अपयशी होतो हा आपल्या सर्वांचा अॅनालिसीसचा भाग आहे. त्यावर आपण कमेंट करु शकता. पण नक्की याचा परिणाम नक्की होतो. त्यामुळे या विषयावर कुटुंबात चर्चा होते. पण गेल्या काही वर्षात आम्ही तशी चर्चा करणं सोडून दिलेलं आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
मुलाबद्दल तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“मुलाच्या पाचवीपर्यंत त्याच्या सहा शाळ्या बदलल्या गेल्या. कारण दरवर्षी शाळा चेंज व्हायची. सुरुवात मुंबईपासून झाली, मग सोलापूर, मग नवी मुंबई, पुणे, नाशिक, परत मुंबई असा प्रवास त्याला करावा लागला. एका ठिकाणी एका वर्षापेक्षा जास्त काळ त्याला मिळाला नाही. त्यामुळे मित्र परिवार कधी डेव्हलोप करता आला नाही. त्यामुळे माझे मित्र नाहीत, अशी खंत त्याची होती”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
“ज्यावेळेस माझी बदली होते त्यावेळेस त्याचा पहिला प्रश्न असा असतो की, आता तुमच्याबरोबर मला यायचं आहे का? परत माझी शाळा बदलायची आहे का? त्यावेळेस ती कठीण परिस्थिती असते. पण त्याला सामोरं जावं लागतं. कारण तुम्ही एक पब्लिक सर्व्हंट म्हणून भूमिका घेतलेली आहे, तो रोल तडीस न्यायचा असेल तर ते माझं दायित्व आहे”, अशी भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा