आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील घरे, सेस इमारती आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांवर महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न आणि पुनर्विकासाची गती यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला.