#nageshpatilashtikar #uddhavthackeray #shivsenarebel #eknathshindeहिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला रामराम ठोकत वेगळा गट स्थापन केल्यानंतर प्रथमच आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत त्यांनी हा निर्णय केवळ मतदारसंघातील विकासकामांसाठी घेतल्याचा दावा केलाय, कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती आणि अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत होते, त्यामुळे सत्तेत जाऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे आष्टीकर म्हणाले.