ठाकरेंचे ६ खासदार फुटल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशातच नगरसेविका माधुरी मांजरेकर यांची भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे.शिवसेना मनामनात असून पक्ष कधीच संपणार नाही, असे त्या ठामपणे म्हणाल्या.उद्धव ठाकरे भेटत नाहीत, हा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले.खासदार ओमराजे निंबाळकर यांना परत येण्याचे आवाहन मांजरेकर यांनी केले.