Melghat Water Crisis: डिजिटल इंडिया आणि ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे विदारक वास्तव मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यात उघडे पडले आहे.
केकदाखेडात जलस्रोत कोरडे…
केकदाखेडा गावाची लोकसंख्या अवघी १५०च्या आसपास असून येथे साधारण २२ घरे आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे गावातील एकमेव विहीर, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पाणी आटल्याने महिला आणि वृद्ध नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. शाळा शिकणे किंवा खेळण्याच्या वयातील येथील अल्पवयीन मुले-मुली जीव मुठीत धरून विहिरीच्या कठड्यावरून खाली उतरतात आणि तळाशी साचलेले दूषित, गढूळ पाणी डब्यात भरतात. हेच दूषित पाणी पिण्याशिवाय गावकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.
Vijay Chavan : छोट्या गावातून तहसीलदारपर्यंत, लाचखोर अधिकारी विजय चव्हाणांची नेमकी स्टोरी काय? सोशल मीडियातही प्रचंड सक्रिय; 19 वर्षांच्या सेवेला भ्रष्टाचाराचा डाग
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ केकदाखेडा गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा आणि गावात कायमस्वरूपी पाणी योजना राबवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास थेट प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
Nagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
गावकऱ्यांनी अनेकदा पंचायत समिती आणि संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. धारणी पंचायत समिती सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याने ग्रामीण भागातील या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला रोज ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचा दावा केकदाखेडा येथील परिस्थितीने खोटा ठरला आहे.
ग्रामसेवकाला निर्देश दिलेत
संबंधित ग्रामसेवकाला तत्काळ संपर्क साधून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. माझ्याकडे प्रभारी पदभार असून रुजू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत, अशी सारवासारव धारणीचे प्रभारी गटविकास अधिकारी रजत कावळे यांनी ‘मटा’शी बोलताना केली.
