• Tue. Jun 9th, 2026
    Nashik News: वादळी पावसाचा कहर; मनमाडमध्ये घर कोसळून पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

    Nashik News: मनमाडमध्ये शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे घर कोसळून पतीचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

    नाशिक पाऊस बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, मनमाड: शहर परिसरात शनिवारी रात्री आलेल्या वादळी पावसात घर कोसळून पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना रमाबाई नगर परिसरात घडली.

    शनिवारी मनमाडमध्ये जोरदार वादळासह मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रमाबाई नगर येथे राहणारे संजय विठ्ठल संसारे यांचे घर पावसामुळे पडले. ढिगाऱ्याखाली संजय संसारे आणि त्यांची पत्नी अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून दोघांना बाहेर काढले आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र संजय संसारे यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

    Maharashtra TimesNashik Onion: कांदा खरेदीला उद्या मुहूर्त; NAFED, NCCFमार्फत थेट खरेदी, अधिकारी साधणार समन्वय
    दरम्यान, संसारे यांचा मृत्यू झाल्यानंतर नगरसेवक विशाल आहिरे व साथीदार उपजिल्हा रुग्णालयात आले. उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करीत त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यानंतर वाद वाढून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे नमूद आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीराज शिंदे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विशाल व प्रमोद आहिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे; पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

    विजांच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा अनेक तास बंद होता. नंतर वीज सुरू झाली तरी काही भागात व्होल्टेज कमी असल्याने अडचणी आल्या. रविवारीही मुख्य बाजारपेठेसह बहुतांश भागात वीज नसल्याने शहर अंधारात गेले. दोन दिवस तासंतास वीज गायब राहिल्याने कंपनीच्या कारभाराबाबत नागरिकांत संताप वाढला.

    Maharashtra TimesNagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
    रविवारी (दि. ७) सायंकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मनमाडला तडाखा दिला आणि काही ठिकाणी गारा पडल्या. अचानक पावसामुळे रविवारच्या आठवडे बाजारात गेलेल्या महिलांमध्ये भीती निर्माण झाली, तर मुसळधार पावसात भाजी विक्रेत्यांचे मोठे हाल झाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा