बाळ माने यांनी विधान परिषद निवडणुकीतून अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि कोकणाच्या राजकारणात भूकंपच आला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मानेंची हकालपट्टी तर झालीच पण सोबतच मानेंनी कोट्यवधी रुपये घेऊन उमेदवारी मागे घेतली असल्याचा ठपका ठेवण्यात येतोय. या प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत आणि विनायक राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय.