अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्याच प्रतिक्रियेत मोठा राजकीय संदेश दिला. बिनविरोध निवड होताच मामा जयंत पाटील यांना फोन करणार असून शरद पवारांचीही भेट घेणार असे तनपुरेंनी म्हटले. तनपुरेंच्या या प्रतिक्रियेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या तिकिटावर विजय मिळवलेल्या तनपुरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.